Domestic Violence: विवाहित महिलेला जबर मारहाण करून घराबाहेर काढले. पती व सावत्र मुलगी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

Domestic Violence: पोलीस स्टेशन नेर अंतर्गत असणाऱ्या मांगला देवी येथील विवाहित महिला सौ. सुवर्णा शेलोकार वय २८ हिला तिच्या पतीने व सावत्र मुलींनी जबर मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली.या महीलेला जबर दुखापत झाली असून,ती सध्या नेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची हाकिकत येणेप्रमाणे, मांगलादेवी येथील प्रभाकर बुद्धराम शेलोकार वय 48 यांची सुवर्णा ...
Read more
Dengue Maharashtra: आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू.

पालकांनो वेळेत उपचाराची काळजी घ्या. Dengue Maharashtra: मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. बुधवारी आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले असून पालकांनी मुलांच्या उपचारासाठी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यवतमाळ तालुक्यातील वरुड येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ऋतिका किशोर उमरे (१५) रा. वरुड या विद्यार्थिनीचा मंगळवारी मृत्यू झाला. ...
Read more
आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित ...
Read more
मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)

मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी) प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन ...
Read more
पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

यवतमाळ : पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.इतिहासातील विक्रमी पाऊस जिल्ह्यात कोसळल्यानंतर सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली.यातूनच ज्यांचे सर्वस्व वाहून गेले अशा लोहारा आणि भारी (तळेगाव) येथील पूरग्रस्तांसाठी माऊली अर्बन बँक धावून आली.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचे सांत्वन केले. या कार्यातून ‘माऊली’ने पुन्हा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. यंदा कोसळलेल्या पावसाने यापूर्वीचे ...
Read more
पूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.

यवतमाळ संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ ...
Read more
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा न. प. अंतर्गत विकास कामांना 10 कोटी रुपये मंजुर.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित. कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे ...
Read more
जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा विराट मोर्चा,अतिवृष्टी, पूरग्रस्त व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची शासनाकडे मागणी.

यवतमाळ / हरीश कामारकर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ ...
Read more
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे ...
Read more
वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह.

वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह. फुलचंद भगत मंगरुळपीर:-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरीकांना अधिकाधीक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच,त्याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने वाशीम महसूल उपविभागात यावर्षी १ ...
Read more