Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळत असताना आता सरकारने नवा ACTION PLAN आखला आहे,या माध्यमाने आता या योजनेत सरकार पुन्हा लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढून त्यांना अपात्र करणार आहे.
या प्लान अंतर्गत महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी राज्यभरात सरकारने आता नवे निकष लादलेले आहे.{MMLBY}आता घरोघरी जावून अर्जांची पडताळणी सुरू असताना यात नवे निकष लावण्यात येत आहे.
यासाठी सरकार ने जे नवीन निकष आणि नियम लागू केले आहे,यामुळे आता या निकषात न बसणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.यासाठीच राज्य सरकारने हा नवा प्लॅन आखला आहे.यामध्ये राज्यभरात अंगणवाडी सेविकां आणि आरटीओ विभागावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता नव्याने पडताळणी सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढून त्यांना बाद ठरवून सरकार या माध्यमातून योजनेचा आर्थिक बोझ कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.यासाठीच आता सरकारने हे नवीन निकष लागू केलेली आहे.{New Criteria For MMLBY}
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक ठरलेली आहे,कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू करून यातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्याची सुरुवात केली होती.{DCM Eknath Shinde}
यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा प्रचंड असा फायदा मिळाल्याचा दावा करताना राज्यात पुन्हा तीच सरकार सत्तेत आली.यात लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दावे करताना आता या लोकप्रिय योजनेत सरकारने नवीन निकष लागू केले आहे.
याद्वारे अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेत बाहेर करण्यात येणार आहे.सरकारच्या मते निकषात न बसणारे आणि अपात्र असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
त्यामुळे आता सरकारने अपात्र महिलांना यातून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे.यात नवीन नियम आणि निकष लावले जात आहे.
हे आहेत नवीन निकष
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना लाभार्थी महिलांच्या नावावर 5 एकर शेती पेक्षा जास्त शेती नावावर नसावी.
- महिला जर शासकीय नोकरीत असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- महिलेच्या नावावर जर चार चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.जर लाभ घेत असेल तर त्यांना आता बाहेर काढण्यात येत आहे.
- चार चाकी वाहन नावावर असलेल्या किंवा 5 एकर पेक्षा जास्त शेती नावावर असलेल्या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना आता नवीन निकषाच्या आधारावर अपात्र करण्यात येणार आहे.यासाठी अशा अर्जनाची आणि लाभार्थींची चौकशी सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे.
- आतापर्यंत राज्यभरात लाखोच्या संख्येने अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून बाद करून आर्थिक लाभ रोखण्यात आले आहे.
- आता नव्याने निकषानुसार लाभार्थी महिला जर शासकीय नोकरीवर असेल त्याच्या नावावर चारचाकी वाहन असेल,तर अशा महिलांना सर्वप्रथम योजनेतून वगळले जाणार आहे.
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींना आता मिळणार नाही पैसे.
राज्य सरकारने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष आणि नियम लागू केलेले आहे.यानुसार आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर एकत्रित किंवा विभक्त अशा कुटुंबात राहत असेल आणि तिच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावरही चार चाकी वाहन असेल तर अशा लाभार्थी महिलांना सुद्धा याचा फटका बसणार आहे.महिलेच्या घरात तिच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावर जर फोर व्हीलर वाहन असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.घेत असेल तर तो आता बंद होणार आहे.
इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नाही
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले आणि मागास असलेल्या महिलांसाठी लागू केलेली होती.पण या योजनेचा जास्त उत्पन्न असलेले आणि इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिलांही योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारचे आता लक्षात आले आहे.
त्यामुळे आता सरकारच्या पडताळणी करीत असून लाभार्थी महिलांच्या यादीत असलेल्या आणि अशा महिला ज्या इन्कम टॅक्स भरीत आहेत,आणि लाडकी बहिण योजनेचाही लाभ घेत आहे,अशा पात्र महिलांना अपात्र करण्याचे निर्णय सरकारने घेतले आहे.
यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात नियमात आणि निकषात न बसणाऱ्या महिलांनी सुद्धा लाभ घेणे सुरू केले असल्याने सरकारने आता सर्वच अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे.
यासाठी आता राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्याने,आता या विभागांने लाभार्थी महिलांच्या यादींची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांसह,आरटीओ विभागाकडे सोपविली आहे.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोणत्या लाभार्थी महिला इन्कम टॅक्स भरत आहे, महिला इन्कम टॅक्स भरत असताना योजनेचा लाभ घेत आहे का?आणि इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे.
आरटीओ विभागकडून आता अशा महिलांची नावे काढण्यात येत आहे,ज्या महिलांच्या नावाने चार चाकी वाहन आहे.
किंवा पती किंवा सासरयाच्या नावावर चारचाकी वाहन आहे का,अशी यादी राज्यात सर्व जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडून तयार करून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात येत आहे.
याच्या आधारावर या योजनेत आता नव्या निकषानुसार महिलांना अपात्र करण्यात येणार आहे.