Aurangzeb Tomb : कायद्यानुसार महाराष्ट्रात औरंगजेबाची कबरला कसे मिळालेले आहे संरक्षण?

Aurangzeb Tomb : सध्या देशात छत्रपती संभाजी राजे आणि मुघल बादशहा औरंगजेब यांच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर आधारित चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेब चा इतिहास आणि त्याची कबर पुन्हा चर्चेत आहे.

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जवळच खुलताबाद येथे बादशाह औरंगजेबाची कबर आजही अस्तित्वात आहे.{Tomb Of Aurangzeb}.मात्र या कबरीवरून महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय वाद होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यादरम्यान अनेक राजकीय आणि धार्मिक संघटनांनी तेथील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी सुरू केलेली आहे.आता यात महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या या खुलताबाद मधील कबरीला कायद्यानुसार संरक्षित करण्यात आलेले आहे,अशी माहिती आता समोर आली आहे.

यामुळे महाराष्ट्र सरकारवर या कबरीला हटविण्याचा सामाजिक आणि धार्मिक दबाव आहे तो महाराष्ट्र सरकार झुगारून काढणार की त्याला या मुद्द्यावर कायद्यानुसार समाधान काढणे शक्य होईल,याबाबत विविध चर्चा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झाले आहे.

नुकतेच महाराष्ट्रात  स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय उत्तर अधिकारी आणि पुत्र छत्रपती संभाजी राजे आणि मोगल बादशाह औरंगजेब यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हिंदी चित्रपट छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुगल बादशाह औरंगजेब आलमगीरच्या ऐतिहासिक चरित्रावर चर्चा सुरू आहे या चित्रपटात औरंगजेबाला खूप क्रूर शासक दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या रिलीज नंतर महाराष्ट्रातून आता औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी जोर धरत आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे नेते अबू आसीम आजमी यांनी औरंगजेब बादशहा महान असा शासक होता असे विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला,मात्र त्यांच्या या विधानामुळे औरंगजेबच्या संदर्भात उठलेल्या वादाला जास्त हवा मिळताच आमदार आजमी यांनी आपले विधान मागे घेतलेले आहे.

मात्र तरीही औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी कमी होताना दिसत नाही.त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या संपूर्ण वादाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अब्दुल मुजफ्फर मुहीयुद्दिन  औरंगजेब आलमगीर हा महाराष्ट्रात खुलताबाद या भागाचा सर्वात आधी सुभेदार होता.त्यानंतर तो भारतात मोगल सम्राट झाला.औरंगजेबाचा मृत्यू हा महाराष्ट्रात झाला होता,कारण त्याचे त्यावेळी वास्तव्य मराठा साम्राज्यात होते.

आपल्या मृत्युपत्रात औरंगजेबाने आपल्या मृत्यूनंतर खुलदाबाद येथे साधारण पद्धतीने दफनविधी करून साधारण कबर बनविण्याचे,आणि कोणतेही मोठे समारंभ आयोजित न करण्याची इच्छा मृत्युपत्रात नमूद केली होती.

त्याच्या इच्छेनुसार या मुघल बादशाहला तत्कालीन औरंगाबाद शहर आणि वर्तमान काळात छत्रपती संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलदाबाद येथे दफन करण्यात आले.या मुघल बादशहाची साधारण कबर बनविण्यात आली होती.त्याच्या साधारण चौथरा आजही या ठिकाणी अस्तित्वात आहे.

माहिती अधिकारातून समोर आली नवीन माहिती.

औरंगजेबाच्या ऐतिहासिक चारित्र्याचे पार्श्वभूमीवर सामाजिक आणि धार्मिक चर्चा सुरू होत असतानाच, औरंगजेबाच्या कबर संदर्भात माहिती अधिकाराच्या एका अहवालाने या वादाला  नवे किनार दिली आहे,नुकतेच हिंदू जनजागृती समितीकडून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून या संदर्भात माहिती काढण्यात आली आहे.

त्यानुसार वर्ष 2011 ते 2023 पर्यंत केंद्रीय पुरातत्त्विक विभागाकडून {ASI Department}औरंगजेबाच्या खुलदाबाद येथील कबरीच्या देखभालीवर तब्बल 6 कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची नवीन माहिती समोर आलेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे कोकण भागात सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या देखभालीवर या विभागाकडून एका वर्षात फक्त 6 हजार रुपये खर्च करण्यात आले,मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी इतका प्रचंड खर्च का करण्यात आला ? हा प्रश्न हिंदू  जनजागृती समितीने उपस्थित केला आहे.राज्यात इतर धार्मिक स्थळांच्या देखभालीला प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोपसुद्धा या समितीने केलेला आहे.

औरंगजेबाच्या कबर आणि राजराजेश्वर मंदिराच्या देखभाल खर्च पार्श्वभूमीवर माहिती अधिकाऱ्याच्या कायद्यानुसार समोर आलेल्या या माहितीनंतर हिंदू जनजागृती समितीने भेदभाव होत असल्याचेही म्हटले आहे. सोबतच या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण मागत या समितीने खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मह्त्वाचे भाष्य.

राज्यात औरंगजेबाच्या कबरी संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केलेले आहे.{CM Devendra Fadnavis}मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की,औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्त्व विभागाकडून कायद्यानुसार संरक्षण मिळालेले आहे,आणि ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली आहे.त्यामुळे तेथून कबर हटविण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी सरकारला कायद्याचे पालन करावे लागेल.एकूणच या विषयावर घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

औरंगजेबाची कबर ( Aurangzeb Tomb ) हटविण्याला विरोध.

बादशाह औरंगजेबाच्या ऐतिहासिक मुद्द्यावर विविध प्रकारे वाद होत असताना,देशात एका वर्गाकडून खुलदाबाद मधील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीला विरोध होतानाही दिसत आहे.या मुघल बादशाची तेथे कबर असल्याने त्याला राष्ट्रीय वारसा मिळालेला आहे,ऐतिहासिक वास्तूंसाठी देशात कायदे आहेत,त्यांची देखभाल कोण करते?आणि सरकारला हवे असल्यास ते हटवता किंवा पाडता येते का? हे जाणून घेणे आता महत्त्वाचे झालेले आहे….

ऐतिहासिक वारसांना ASI द्वारे कायदेशीर संरक्षण

भारतात स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक वारसांना कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतात 2826 ऐतिहासिक वारसे संरक्षणाच्या यादीत आले होते.{Historical Buildings And Tombs}.यानंतर ही यादी वाढत गेली आणि  2014 पर्यंत देशात ऐतिहासिक वारश्यांची संख्या ही एकूण तीन हजार सहाशे पन्नास झालेली आहे.

या ऐतिहासिक वर्षांचे देखभाल आणि संरक्षणाचे काम हे आर्किऑलॉजी सर्वे ऑफ इंडिया{ASI} द्वारे केले जाते. भारतीय संविधानातील कलम 42 आणि 51 A{F} नुसार देशाच्या वारश्यांची आणि वास्तूंचे संरक्षण करणे ही  राष्ट्रीय जबाबदारी मानली जाते.त्यामुळे देशात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी एएसआयकडे आहे.

प्राचीन स्मारक आणि पुरातत्त्विक स्थळ अवशेष अधिनियम1958 च्या 4 {1} या कलमानुसार देशात कोणत्याही ऐतिहासिक इमारतिला किंवा ऐतिहासिक वारसाला राष्ट्रीय महत्त्व देण्याचा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारकडे आहे संसदेने बनविलेल्या कायद्यानुसार देशात राष्ट्रीय ऐतिहासिक वारसे, पुरातत्त्विक इमारती आणि लेखांचे संरक्षण आणि सुरक्षा करणे ही राज्य सरकारचीही जबाबदारी आहे.

जर तेथे त्यांना नुकसान पोहोचविण्याचा किंवा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशा ऐतिहासिक वारसांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.जर कोणी असे वारसे पाडण्याचा किंवा तय्त बदल करण्याचा प्रयत्न करत असेल,तर अशा परिस्थितीत त्याला काय्देनुसार संरक्षण देणे गरजेचे आहे.त्यामुळे एकंदर आता ऐतिहासिक वारसा संरक्षण आणि नियमन करणे ही एएसआय सोबतच सरकारची सुद्धा जबाबदारी मानली जात आहे.

अशी आहे औरंगजेबाची साधारण कबर 

भारतात मुगल बादशाह औरंगजेब याने अनेक दशके राज केले.मात्र त्याने महाराष्ट्रात आपला वास्तव्य असताना  आपला मृत्युपत्र तयार केला होता,त्यात त्यांनी मृत्यूनंतर आपली कबर अगदी साधारण पद्धतीने बनविण्यात यावी,त्यावर जास्त खर्च करण्यात येऊ नये हे नमूद केले होते.

  • बादशाह औरंगजेब हा  राज करीत असताना स्वतःचा खर्च तो कुराण लिहून आणि स्वतः टोप्या शिवून भागवत होता,असे ऐतिहासिक लेख आहेत,त्याने आपल्या मृत्यु नंतर अंतिम विधीचा खर्च आपल्या कमाईतून लावण्याचा सल्ला दिला होता,असे सांगितले जाते.
  • त्याच्या मृत्यूनंतर  औरंगजेबाची कबर ही साधारण माती पासून तयार करण्यात आली होती.यानंतर ब्रिटिश साम्राज्यात लॉर्ड कर्जनच्या काळात या कबर वर संगमरवर लावण्यात आले.
  • यादरम्यान या मकबऱ्याची वास्तू कला इस्लामिक शैलीची बनविण्यात आली.
  • हा मकबरा खूप साधा आणि पांढऱ्या रंगाचा आहे.
  • औरंगजेबाच्या कबरीजवळ त्याचा मुलाचाहा मकबरा सुद्धा आहे.सोबतच शेख जैनुद्दीन यांची दर्गासुद्धा जवळच आहे.
  • मकबराच्या भिंतीवर औरंगजेबाचे पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहीयुद्दिन  औरंगजेब आलमगीर लिहिलेले आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.