Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक सिंचनासाठी वीज उपलब्धतेसाठी मोठी अशी खुशखबर दिलेली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॉवर माध्यमाने विज उपलब्ध व्हावी;यासाठी सर कृषी पंप योजनेसाठी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी वितरण मंजूर केलेला आहे.
त्यामुळे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून वीज उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र सरकारकडून प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना अंतर्गत राज्यभरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असलेल्या शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप”ही योजना सुरू केली असून,शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळावी या उद्देशाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.महावितरण कंपनीला हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे.
केंद्रीय योजनेच्या धरतीवर राज्यात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप:
राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेतून सिंचनासाठी कृषी पंप योजना सुरू असून यातून शेतकऱ्यांना मदत मिळावी या उद्देशाने केंद्रीय घटक योजना अंतर्गत राज्यात अनुसूचित जाती घटक कार्यक्रम मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत चालविला जात आहे.{CM Solar Water Pump Scheme }
राज्य सरकारने यासाठी एकूण 444.6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.यापैकी आतापर्यंत या योजनेसाठी 29 कोटी 70 लाख रुपये खर्च झाले आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सरकारने सोलर वाटर पंप साठी निधी वितरणाची प्रक्रिया निश्चित केली आहे.शासन निर्णय संदर्भ क्रमांक 3 मधील जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार,शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेतून लाभ घेण्याकरिता रक्कम वितरणासाठी गाईडलाईन सुद्धा जागी करण्यात आली आहे.
निधी वाटपासाठी उर्जा,कामगार विभागाची अप्पर मुख्य सचिव { ऊर्जा विभाग} यांना मान्यता.
राज्याच्या वित्त विभागाच्या मान्यतेनुसार उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नुकतेच 100.30 कोटी रुपये प्रशासकीय विभाग प्रमुख या नात्याने अप्पर मुख्य सचिव{ ऊर्जा विभाग} यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ देण्यासाठी हा निधी वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
आता हे आर्थिक वितरण विशिष्ट तंत्रज्ञान आधारित प्रणाली द्वारे केल्या जाणार आहे.यामुळे राज्यात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा योग्य पद्धतीने लाभ मिळावा आणि निधी पारदर्शीपणे खर्च व्हावा यासाठी प्रशासकीय स्तरावर लक्ष देण्यात येणार आहे.
Saur Krushi Pump Yojana : मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अनिवार्य.
प्रधानमंत्री कुसुम घटक व योजना अंतर्गत पीएम कुसुम योजनेवर महाराष्ट्र सरकारने अमल सुरु केला असून निधीची अर्थसंकल्प मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.आता शासकीय वितरण प्रणाली द्वारे या सोलर वाटर पंप योजनेसाठी निधी वितरित होईल.
सौर कृषी पंप योजनेसाठी निधी खर्च करताना,सरकारने टाकून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अनिवार्य असेल.योजनेदरम्यान अनुदानाचा योग्य विनियोग होत आहे,किंवा नाही याची सरकारच्या यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी होणार आहे.तसेच दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या योजनेवर होत असलेल्या खर्चाचा अहवाल प्रादेशिक आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
यादरम्यान सदर योजनेचा लाभ आणि निधी अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वापरात येणार असून इतर कोणत्याही कामांसाठी याला वापरण्यात येणार नाही याची खात्री सरकार करेल.
एकूणच राज्य सरकारच्या या केंद्रीय योजने संदर्भात निर्णय आणि निधी तरतुदीमुळे अनुसूचित जाती वर्गातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या मदतीने शेतीसाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.यामुळे राज्यात पर्यावरणपूरक उर्जेचा अधिकाधिक प्रसार होईल,असे सरकारचे मत आहे.