10 th Class Paper Leak : महाराष्ट्रात 21 फेब्रुवारी पासून दहावी परीक्षांची सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत.महाराष्ट्रात सर्वात आधी जालना आणि यानंतर लगेच यवतमाळ मध्ये इयत्ता दहावी परीक्षेचा मराठीचा पेपर फोडण्यात आला.
यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजलेली आहे.एकूणच दोन जिल्ह्यात पेपर फुटीच्या या घटनेनंतर आता शिक्षण विभागाचे परीक्षेदरम्यान ढिसाळ नियोजन चर्चेचा विषय झाला आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचे परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या धोरणला सुद्धा या घटना आणि शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हरताळ फासल्या गेली आहे.
10 th Class Paper Leak : परीक्षेला सुरुवात अन प्रश्नपत्रिका सोशल मिडीयावर Viral
31 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजेनंतर दहावीच्या पहिल्या पेपरची सुरुवात होताच,राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील 10 परीक्षा केंद्रावर मराठी पेपर फुटल्याची माहिती समोर आली.विशेष म्हणजे दहावीचा हा मराठी विषयाचा पेपर सुरू होताच अगदी काही क्षणात सोशल मीडियावर सुद्धा हा मराठी प्रश्नपत्र पेपर Viral होताना दिसला.
यवतमाळ मधील महागाव 10 परीक्षा केंद्रावर मराठी पेपर फुटले.केंद्रावर हुल्लडबाजी
महागाव मधील या परीक्षा केंद्र बाहेर परीक्षा यंत्रणेची टीम आणि पोलीस बंदोबस्त असतानाही अनेक युवक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉफी पुरविण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात हुडदंग माजवितांनाही दिसले.याचे व्हिडिओ ही व्हायरल झाले.दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण विभागाने महागाव येथे पेपर फुटीची ही घटना समोर येताच तात्काळ चौकशी सुरू केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर मध्ये पेपर फुट आणि Xerox वर गर्दी.
महागाव तालुक्यात मराठी पेपर फुटल्या पूर्वीच जालना जिल्ह्यातील बदनापूर मधील एका दहावी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर आली.बदनापूर येथील या 10 वी परीक्षा केंद्रावर मराठी विषयाच्या पेपर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात येताच आणि परीक्षार्थींनी ते सोडविण्यापूर्वीच अवघ्या 10 ते 10 मिनिटात या परीक्षा केंद्रातून मराठी विषयाचा हा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मराठी विषयाची प्रश्नपत्रिका लगेच या परीक्षा केंद्र बाहेर पोहोचली,यानंतर बदनापूर मध्ये परीक्षा सेंटरच्या काही अंतरावर असलेल्या झेरॉक्स सेंटरवरून थेट झेरॉक्स काढून या परीक्षा पत्रिका वाटण्यात आल्या,यानंतर या आधारावर लगेच तेथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना उत्तरांची कॉपी पुरविण्याचा प्रकारही झाला.
दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे 31 फेब्रुवारी रोजी दहावी बोर्डाची परीक्षेला सुरुवात झाली असतानाच पहिल्याच दिवशी राज्यात दोन जिल्ह्यात पेपर फुटीच्या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ माजताना दिसली.
महाराष्ट्रात यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा बोर्ड आणि संबंधित जिल्ह्यातील शिक्षण विभागांकडून दहावी कक्षाच्या परीक्षा केंद्रांवर यंत्रणा कार्यरत आहे.
सोबतच परीक्षा केंद्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आली आहे,मात्र यानंतर ही परीक्षा केंद्रांवर अशा प्रकारे पेपर फुटीच्या घटना पहिल्या दिवशी घडल्याने शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर एकंदरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.