Re-Election in Maharashtra : महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर पुनः मतदान?

Re-Election in Maharashtra : महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर पुनः मतदान ? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांनी भरघोस जागांवर विजय मिळविल्यानंतर विरोधी राजकीय पक्ष,सामाजिक संघटने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय घेत आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी EVM मधुन मतदान आणि काउंटिंग झाल्यानंतर संशय घेणाऱ्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक स्तरावर ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एका गावात ईव्हीएम मशीन वगळून निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बॅलेट वर मतदान साठी प्रशासनाला निवेदन.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मतं मिळाले तर महाविकास आघाडीची तिन्ही पक्ष या निवडणुकीत जागेच्या तुलनेत मोठ्या फरकाने पराभूत झाले.यानंतर राज्यभरात ईव्हीएम मशीनवर विरोधक राजकीय पक्ष आक्षेप घेत आहेत. महाराष्ट्रात मतदान आणि काउंटिंगचा हा घटनाक्रम पाहता पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या मारकडवाडी येथे मतदान बॅलेट पेपर वर व्हावा यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हा गाव असून येथे 3 डिसेंबर रोजी पूर्वीप्रमाणे मतदान घेण्यात येणार आहे,मात्र या ठिकाणी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची मागणी मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे केली आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते EVM मशीनच्या विरोधात भूमिका मांडत असताना दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने हा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मोठा मताधिक्य गमावल्यानंतर आता घेणार स्वखर्चाने बॅलेट वर मतदान.

मारकडवाडी येथे ३ डिसेंबर रोजी होणारा मतदान बॅलेट पेपरवर घेण्यासाठी चाचणी घेण्याचा ठराव येथे मंजूर करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात गेल्या अनेक निवडणुकीत शरद पवार गटात असलेले उत्तम जानकर यांनी यंदा या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढली यापूर्वी त्यांचा या भागात मोठ्या मताधिक्याने विजय होत होता,पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला.त्यामुळे या गावात सुद्धा ईव्हीएम मशीन झालेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे एकूणच बॅलेट पेपरवर फक्त चाचणी म्हणून आता जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी या गावाकडून माळशिरस चे तहसीलदाराना लिखित निवेदन देवून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गावात मतदान केंद्रांवर शासकीय कर्मचारी नेमण्याचे पत्र दिले आहे. प्रशासनाकडून अद्याप याबाबत अधिकृत कारवाई करण्यात आली नसली तरी मारकडवाडी या गावात जानकर गट आधी मिळालेला मोठा मताधिक्य कमी झाल्याने बॅलेट वर मतदान घेतले तर आपल्याला कसा मताधिक्य वाढणार हे दाखविण्यासाठी ही मतदान पुनर्प्रक्रिया करीत आहे अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे 3 डिसेंबर रोजी या गावात बॅलेट पेपर ने होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.