Yavatmal District Rain Update : पाऊसाची जोरदार झडी अन् जिल्ह्यात जनजीवन विस्कळित.
यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.सोमवारी दुपारी व रात्री जोरदार पाऊस पडला,यानंतर मंगळवार दुपार पासून सुरू झालेला दमदार पाऊस रात्रभर कोसळला,तर बुधवार 24 जुलैच्या सकाळ पासून शहरात व जिल्ह्यात सर्व ठिकाणी कोसळत होता.यंदा या जुलै महिन्यापर्यंत 141.5 टक्के पावसाची नोंद झाली.दरम्यान गुरुवार 24 जुलै पर्यंत असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.विशेष म्हणजे 17 जुलैपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही तालुक्यात मध्ययम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.या वर्षी ग्लोबल वॉर्मिग व कमी होत असलेल्या वृक्षांमुळे जोरदार उकाडा व. भीषण उन्हाळा सोसावा लागला.बऱ्याच कालावधीनंतर नागरिक यंदा पावसाच्या झडी पाहत आहे. पावसाची ही झड़ येत्या गुरुवार पर्यंत कायम राहणार असून काही तालुक्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जोरदार पावसाने पिकांना धोखा उदभवला.
दरम्यान निरंतर होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात कोठेही मोठे नुकसान झाला नाही,मात्र पावसाच्या जोरदार झडीमुळे अनेक महसूल मंडळात कापूस,सोयाबीन पिकाच्या शेतात माती चीबाड झाल्याने पिकांना धोखा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुसद,महागाव,बोरी,वणी,बाभूळगाव या विविध नदी स्थानी असलेल्या तालुक्यांमध्ये संभावित आपात्कालीन परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासन व आपत्ती निवारण कक्ष व बचाव पथकाला अलर्ट वर ठेवले लक्ष आहे.
आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात अलर्ट मोड वर.
जिल्ह्यात काही मोठे महसुल मंडळांमध्ये काही गावात अतिवृष्टी सारखी स्थिती होती,यात पिकांना नुकसान झाल्याने महसूल विभाग याचा सर्वे करीत आहे. कापूस,सोयाबीन सह इतर काही पिकांचा सतत पडणाऱ्या पावसाने नुकसान पोहोचविले आहे.तर बुधवार दुपार पर्यंत जिल्ह्यात कोठेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याची नोंद शासन दफ्तरी नव्हती.मुख्य म्हणजे रिपरीप पावसाने अनेक धरण भरले असून लहान नद्या दुथडी भरून वाहत आहे मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला नाही. सतत पडणारा जोरदार पाऊस पाहता जिल्हा प्रशासन कडून सर्व तालुक्यातील शासकीय आपत्ती नियंत्रण यंत्रणांना सतर्कता राखून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गोकी, सावरखेडा,निळोणा,चापडोह प्रकल्प ओव्हरफ्लो.
जिल्हयात सतत पडत असलेल्या पावसामुळे लहान व मध्यम धरण भरली असून मोठ्या धरणाची पाणी पातळी वाढली आहे.गोकी,सायखेडा,निळोणा, चापडोह हे प्रकल्प 100 टक्के भरले अस मोठ्या प्रकल्पांमध्ये मंगळवार संध्याकाळ पर्यंत पुस 63.5 टक्के, अरुणावती 27.59, बेंबळा45.32टक्के पाणी पातळी नोंद करण्यात आली.मध्यम प्रकल्पामध्ये लोअर पुस 61.14 टक्के, बोरगाव 67.62 टक्के, अडाण 65 टक्के,तर लघु प्रकल्पांमध्ये नवरगाव धरणात 72.440 पाण्याची नोंद झाली.