Yavatmal-Washim Lok Sabha 2024: भावना गेल्या रोषात, राजश्री आल्या जोशात!

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पांढरे सोने उगवणाऱ्या जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, कारंजा, दिग्रस, पुसद, राळेगाव असे सहा मतदार संघ या जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हा भाग वाशिम जिल्ह्यात मोडतो. निवडणूक जवळ जवळ आली असताना या जिल्ह्याचा उमेदवार का फिक्स होत नाहीयेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील रस्सीखेच सुरू असतानाच राजश्री पाटील यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

कारण सतत 25 वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोषाची भावना उत्पन्न होताना दिसते आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेच्या शिंदे वर्सेस ठाकरे या पक्षांमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षांकडून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ जिल्ह्याचा राजकीय इतिहास :

2009 मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात एकूण 1554042 मतदार होते. एकूण मतांची संख्या 840064 होती. या जागेवरून शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी (पाटील) विजयी झाल्या आणि त्या खासदार झाल्या होत्या. त्यांना एकूण 384443 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हरिसिंग राठोड यांना एकूण 327492 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले होते तर त्यांचा 56951 मतांनी पराभव झाला होता.

2014 मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात एकूण 1755292 मतदार होते. एकूण मतांची संख्या 1032949 होती. या जागेवरून पुन्हांदा शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी विजयी होऊन खासदार झाल्या. त्यांना एकूण 477905 मते मिळाली होती. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ॲड शिवाजीराव शिवरामजी मोघे यांना एकूण 384089 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहावा लागलं होतं. त्यांचा 93816 मतांनी पराभव झाला होता.

2019 मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात एकूण 1916185 मतदार होते. एकूण मतांची संख्या 1174220 होती. या जागेवरून 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी विजयी पताका फडकाविला होता. त्यांना एकूण 542098 मते मिळाली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना एकूण 424159 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहून भावना गवळी यांच्या कडून 117939 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता.

परंतु यावेळी भावना गवळी यांची वर्षानुवर्षी चालत आलेली खासदार बनण्याची परंपरा यावर्षी महायुतीने मोडून काढली आहे. जयश्री पाटील यांच्या नावाचा पुकारा करून भावना गवळी यांना जबर धक्का दिलेला आहे. आता गवळी पक्षांतर करेल की अपक्ष उमेदवार म्हणून लढतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या दबावाखाली येऊन महायुतीच्या एकनाथ शिंदेनी असे तर केले नसावे अशी ही धाकधूक लागलेली आहे.

भावना गवळी यांच्या समर्थकांचा रोष :

2024 या लोकसभा निवडणुकीसाठी भावना गवळी आता यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. मोदींना राखी बांधून सुद्धा भाऊ बहिणीची बांधिलकी जोपासली नाही आणि त्यांच्या तिकिटाचे संरक्षण झालेले नाही, अशी चर्चा होत आहे. काही दिवसापूर्वीच भावना गवळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मात्र त्यांना मार्ग मिळाला नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळेच भावना गवळी यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि समर्थक आक्रमक झाले आहेत.

तर का कापले गेले गवळींचे तिकीट?

– यवतमाळ मध्ये सतत पालकमंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यात होणारी मतभेद यात काही नावीन्य नव्हतेच.

– या मतभेदांमुळेच यवतमाळ वाशिम संघातील बंजारा लोकांची मते विभागली गेली होती, आणि संजय राठोड यांच्याकडे वळण्यात आली.

– विशेष म्हणजे भावना गवळी यांचा जनसंपर्क फार कमी असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच त्यांना रेड सिग्नल मिळाला असावा.

– तर भाजपने आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे व्हावे याकरिता खेळत असलेल्या खेळी मध्ये भाजपच्या दबावाखाली उमेदवारी निश्चित होत असल्याकारणाने भावना गवळी यांचा तर पत्ता कट झाला नाही ना? असे प्रश्न देखील वारंवार उभे होत आहेत.

राजश्री पाटील यांचे भावना यांच्यावर वक्तव्य :

“निश्चितच भावना गवळी या महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत. माझ्यासाठी त्या मोठ्या मार्गदर्शिका आहेत. मोठ्या बहिणी सारख्या आहेत. त्यांचे सहकार्य निश्चित मला मिळेल. लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील आणि आशीर्वाद देतील अशी माझी आशा आहे.”

कोण आहेत राजश्री पाटील?

राजश्री पाटील आज उमेदवारी अर्ज दाखील करणार आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यवतमाळ मध्ये उपस्थित राहणार आहे. सभेच्या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा प्रचार रथ दाखील झाला आहे. हेमंत पाटील यांना हिंगोलीतून शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजश्री पाटील या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा आहेत. 2019 मध्ये नांदेडमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढावली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यां आणि महिलांसाठी नेहमीच कार्यरत असणाऱ्या महिला म्हणून त्यांची ओळख आहे. गवळींचा पत्ता कट झाल्या कारणाने आणि राजश्री पाटील यांच्या एन्ट्री ने यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीचे समीकरण बदलणार की भावना गवळी राजश्री पाटलांना सहकार्य करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.