![Kalamb Murder Case : संशयातून पत्नीसह चौघांचा निर्घृण खून, तीरझडा गावात घडला थरार.](https://vidarbhatimes.in/wp-content/uploads/2023/12/Y2012231-1.jpg)
Kalamb Murder Case : संशयातून पत्नीसह चौघांचा निर्घृण खून, तीरझडा गावात घडला थरार.
Kalamb Murder Case : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात एकाच कुटुंबातील चार लोकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे,बुधवार 20 डिसेंबरच्या रात्री या हत्याकांडांच्या घटने मुळे परिसर हादरले आहे. संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या जावयाने आपल्या सासरच्या चार लोकांची हत्या केली. जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तिरझडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली.
मृतक हे पारधी समाजातील आहेत. मारेकरी हा या कुटुंबाचाच जावई असल्याचे समोर आले आहे. त्याने पत्नी, दोन साळे, सासरा यांची हत्या केली. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली. मंगळवारी (19 डिसेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. पंडित भोसले, सुनील पंडित भोसले, ज्ञानेश्वर पंडित भोसले, रेखा गोविंदा पवार अशी मृतांची नावे आहेत. तर सासू रुखमा पंडित भोसले या जखमी आहेत. गोविंद विरचंद पवार या आरोपीने या चौघांची हत्या केली.
भोसले हे पारधी बेड्यावर वास्तव्यास होते. गोविंदला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कळंब पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.