जगण्याचे गणितच बिघडले,अवकाळीने आणले डोळ्यात पाणी : कारभारणीचे सोनेही गहाण

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा : भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी राबराब राबून अन्नधान्य पिकवितो. शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिणीचे दागिणे गहान ठेवतो. परंतु, कधी सुलतानी संकट तर असमानी संकटाने शेतीतील पिकांची माती. मग माती खाऊन शेतकरी जगणार का? असा प्रश्न ना झोपू देत न जगु देत, अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांचे डोळ्यात अश्रु आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरील सोन्याचे दागिने मोडून किंवा गहाण करून या पैशातून शेतातील खरिपाची लागवड करतात.दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असून यावर्षी तर जुलै महिन्यात दोनदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

त्यातूनही सावरलेल्या पिकांवर भिस्त असताना मागील आठवड्यात भऱ्यापासून खराब हवामान आणि आलेल्या अवकाळी पावसाने कापूस पीक मातीमोल झाले तर तुर पिकाचा सपाय झाला आहे.त्यातच रब्बीतील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे खरिपाच्या पेरणी करिता घरच्या बाईचे अंगावरील सोने गहाण करून किंवा कर्ज काढून पेरणी केली.

या केलेल्या पेरणीतून होणाऱ्या उत्पन्नातून परतफेड करू ही आशा बाळगत असताना यावर्षीचा शेतकऱ्यांना निसर्गाच्या व कृपेचा फटका बसत आहे व अवकाळीने झालेले नुकसान व उत्पन्नाचे ढासळलेले दर या मुळे तीन वर्षापासून नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांचे बजेट जुळलेले नसून यंदा तरी कर्जातून मुक्त होऊ अशी आशा बाळगत असताना तोंडचे पाणी पळाले आहे त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यातील बळीराजांनी केली आहे.

पावसाच्या सरी थांबल्या पण अश्रू आजही वाहत.

उत्पन्नातून आर्थिक संकटाचा डोंगर कमी होईल या आशेवर असतांना आता अवकाळीने पाणी फेरले आहे. त्यामुळे ढगामधून बरसलेल्या सरी थांबल्या परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबले. नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर कर्जाचा डोंगर थांबला नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen − 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.