बाभूळगाव ता प्र मोहम्मद अदीब
तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन.
महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे अंमलबजावणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले.
पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना शासन निर्णयाद्वारे अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले त्या चार राज्याचा सदर समिती भेट देवून, अभ्यास करुन महाराष्ट्रात धनगरांना शासन निर्णय काढून आरक्षण अंमलबजावणी करण्याचे अभिवचन दिले होते.
परंतु शासनाने दिलेला पन्नास दिवसाचा अवधी संपुन वरिलप्रमाणे शासनाने दिलेला शब्द फिरविल्याने व सदर अवधीत काहीही प्रयत्न केल्याचे दिसत नसल्याने धनगर समाजात शासनाने महाराष्ट्रातील धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचे निदर्शनास येते. तेव्हा धनगरांचा विश्वासघात करणाऱ्या या शासनाचा निषेध करण्यात येत असुन ताबडतोब महाराष्ट्र राज्यात धनगरांना अनुसुचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.
अन्यथा राज्यात धनगर समाज यापुढे तिव्र आंदोलन करण्याचे मनःस्थितीत असुन त्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील. तेव्हा शासनाने या बाबीची दखल घेवुन त्वरीत अंमलबजावणी करावी ही विनंती.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते सारंग विलासराव शेळके ,सोना दामाजी कुलाल, पृथ्वीनंद तुळशीराम निवल, रमेश माहनुर,विजय मोतीरामजी पोफारे,सुभाष सूर्यभानजी मोटके संदिप सुनिल शिंदे.राजु मारोती केसकर, आदी सकल धनगर समाज उपस्थित होते.