*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
जेतवन पर्यटनस्थळी घटना.गाळात फसल्याने झाला घात.
दारव्हा – यवतमाळ आर्णि रोड मार्गावर मनदेव जवळ जेतवन पर्यटनस्थळ आहे या ठिकाणी ध्यान केंद्र असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक स्थळी येतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी महागाव कसबा येथे आलेली. चिमुकली मामासह जेतवनला भेट देण्यासाठी आली. सर्व नातेवाईक जेतवन परिसराची पाहणी करत असताना दोन बहिणी परिसरातील तलावात बुडल्या त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले मात्र दोघींचाही मृत्यू झाला ही हृदयानायक घटना शनिवारी सायंकाळी ५:३०वाजता घडली.
यामधील कु. रिया किशोर बिहाडे वय १२ रा. महागाव कसबा व कु.काव्य धम्मपाल भगत व ११ रा. मंगरूळपीर जिल्हा वाशिम अशी या चिमुकल्या मुलींचे नावे आहेत रिया ही काव्याची आतेबहीण आहे. काव्या मामा किशोर बिहाडे ( सरपंच)यांच्याकडे दिवाळीच्या सुट्ट्यात आली होती. आई व मामा यांच्यासोबत ती जेतवन पर्यटनस्थळी आली तेथे ध्यान केंद्र सर्व कुटुंबासह बसलेले असताना दोन चिमुकल्या बाहेरच्या परिसरात खेळत होत्या अचानक त्या तेथील तलावात पडल्या पाण्यात मुली बुडत असल्याचे किशोर बिहाडे यांच्या लहान भावाच्या लक्षात आले त्या मुलींना तलावा बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. ऋषिकेश माहुरे .
संतोष खंडागळे .अमोल चौधरी. वैभव महेर. या तरुणांनी धाव घेऊन त्या चिमुकलींना तलावाच्या बाहेर काढण्यासाठी मदत केली .दोघींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल ढोमणे जमादार संजय राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली या प्रकरणाची अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.