ढाणकी: Kisaan संजय सल्लेवाड यांचा दि.२३/१०/२०२३ रोजी., सकाळी दहा वाजताच्या सुमारास डी.पी जवळ झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे दोन एक्कर Ganna जळाला असून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाजूच्या शेतकऱ्यांनी व सल्लेवाड यांनी आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आगीची तीव्रता एवढी होती की,आग आटोक्यात येऊ शकली गेली नाही.
शेवटी हतास होऊन वर्षभर राबराबून लहानाचा मोठा ऊस करून आपल्या लेकरा बाळांन प्रमाणे जोपासलेला उभा ऊस डोळ्या देखत जळाला. सोयाबीन, तूर, कापूस यावर रोगराई मुळे शेतकरी त्रासला असून ऊसउत्पादनाकडे वाटचाल चालवलेली दिसून येत आहे.संकट जणू शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सोयाबीन, तूर ,कापूस या पिकाला कंटाळून सततची नापिकी यामुळें शेतकरी ऊस उत्पादकते कडे वळला असता त्वरित ऊस तोडीस आलेला ऊस जळाला. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन गेला. शेती कसावी तर कशी ? हा खूप चिंतेचा विषय आहे.शेती कसने खूप जिकिरीचे झालेले असून.
यातच आता जळालेल्या ऊसाला वीस टक्के कप्पात त्यात वजन कमी शासणा तर्फे कोणतीही मदत नाही. यामुळे शेतकरी चांगलाच पेचात पडलेला दिसत आहे. शासनाने योग्य ती दखल घेऊन जळालेल्या ऊसाचा पंचनामा त्वरित करण्यात यावा तसेच ऊस कारखान्याने कोणत्याही अटी तटी न घालता कोणत्याही प्रकारची कपात न करता संबंधित कारखान्यांनी ऊस त्वरित नेण्यात यावा. त्यामुळे थोडी का होईना शेतकऱ्याची उणीव भरून निघेल.असे शेतकरी संजय गंगाराम सल्लेवाड मागणी करीत आहे.