26 रोजी नरसी येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन!

नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर तालुक्यातील नरसी येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान जागृती समितीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाबद्दल जन माणसात जागृती व्हावी यासाठी संविधान जागृती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक २४ नोव्हें. रोजी शासकीय विश्रामगृह नरसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने ...
Read more
दारव्हा तहसीलीत ‘Maratha-Kumbi’ जातीच्या फक्त १० नोंदी.

दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार Maratha-Kumbi; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती. शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची ...
Read more
डुक्कराने केली दोन एकर परटीची नासाडी.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील लोंढे यांच्या शेतातील दोन एकर परटीची डुक्कराने केली नासाडी. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आसमानी संकटाचा सामना करता करता नाकी नऊ येतात.जेव्हा चांगले पिक होते तेव्हा भाव मिळत नाही अशा संकटांचा सामना करावा लागतो अशातच वन्यप्राणी उभ्या पिकांचे नुकसान करतात तोंडी आलेला घास वन्यप्राणी पिकांची नासाडी करुन ...
Read more
Ladkhed: उभ्या पिकात जनावरे सोडली.

Ladkhed: दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका शेतातील उभ्या पिकात जनावरे सोडण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तुकाराम परसराम राठोड यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला गावातीलच गुराखी सुनील रायसिंग राठोड याने जनावरे सोडल्याची तक्रार आहे. तुकाराम राठोड यांच्या सात एकर शेतात कपाशीचे पीक उभे होते. त्या पिकामध्ये ...
Read more
वाऱ्हाशेत शिवारात केली वाघाने बकरीची शिकार.

बकरीची नरडी फोडून रक्ताचा घोट घेतल्यानंतर गाईवर हल्ला गाय जखमीं. राळेगांव तालुका प्रतिनिधी: राळेगांव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथे आज दि. २२ नोव्हेंबर रोजी सांय ५ च्या सुमारास शंकर घोडाम,हे वाऱ्हा़ शेतशिवारातून बकऱ्या व गाई चारून गावाकडे येत असतांना वाऱ्हा गावाच्या काही अंतरावर वाघाने अचानक कळपावर झडप घालून एका बकरीची नरडी फोडून ...
Read more
Crop Insurance: शेती पिकांचे मोठे नुकसान: पण सर्वेक्षणच नाही.

Crop Insurance कार्यालयाला मनसेने ठोकले कुलूप. वणी: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडून १ रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे वणी मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्याप पाहणी आणि पंचनामेच करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनसे ...
Read more
Fraud: दुग्ध उद्योजकाची 7 लाख 21 हजाराची फसवणुक.

Fraud: औरंगाबाद येथील ब्रोकरसह मुंबई येथील मिल्क सलायर्सवर उमरखेड पो स्टे ला गुन्हा दाखल. उमरखेड प्रति: येथील नमस्कार अॅग्रो इंडस्ट्रिज या दुध उद्योजकाकडून वसई मुंबई येथील शिमला डेअरी इंडस्ट्रीज करीता दुध विक्रीचा करार केल्यानंतर उमरखेड येथून पाठविलेले दुधाचे टँकर दुसऱ्याच निखील मिल्क सप्लायर वसई मुंबई या डेअरीवर परस्पर विक्री करून सुमारे 7 लाख 21 हजार ...
Read more
Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार एक्शन मोड वर; भरारी पथकाने पाठलाग करून मॅक्स पीक-अप पकडला.

Illegal Sand Transportation: केळापूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वाळू घाटावर बेकायदा वाळू उपसा रात्रंदिवस सुरुच आहे. वेळोवळी सांगूनही वाळूमाफिया ऐकत नसल्याचे पाहून स्वतः तहसीलदार राजेंद्र इंगळे कारवाईसाठी अॅक्सन मोडवर आल्याचे ...
Read more
५० दिवस संपले; आरक्षणाचे काय झाले?

सकल धनगर समाज आक्रमक उपविभागीय अधिकान्यांसह तहसीलदारांना निवेदन, सरकारविरोधात तीव्र निदर्शने. यवतमाळ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ५० दिवसांची मुदत सरकारने मागितली होती. प्रत्यक्षात ५० दिवसांचा कालावधी संपला; मात्र अजूनपर्यंत यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सकल धनगर समाजाने मंगळवारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन सादर करून आरक्षणाच्या ...
Read more
Kaamband Andolan: ६०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निषेधपत्रावर रक्तरंजित स्वाक्षरी.

Kaamband Andolan: मंगळवारी रक्तदान करताना कर्मचाऱ्याची प्रकृती ढासळली. यवतमाळ: राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत येणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी गत २७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीतसामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र गत २७ दिवसात आंदोलनाची दखल झाली नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रक्तरंजित स्वाक्षरी करीत मुख्यमंत्र्यांना निषेधाचे ...
Read more