बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल.
असे होवु द्यायचे नसेल तर भविष्यात होणार्या आंदोलनासाठी आदिवासींनी तयार राहावे असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष मा. Dashrath Madavi यांनी बिरसा मुंडा यांच्या १४८व्या जयंतीनिमित्त “प्रबोधन परिषद ” उमर्डा येथे अध्यक्षस्थानावरून संबोधित करतांना केले. आदिवासींचा गौरवशाली इतिहास आहे.बिरसा मुंडानी १८९५ पासुन सुरु केलेल्या आत्मसन्मानाचे आंदोलन हे बाबुरावजी मडावी यांचे हयातीपर्यंत म्हणजेच २००३ पर्यंत चालले.
हा १०८ वर्षाचे आदिवासींचे आत्मसन्मानाचे आंदोलन बिरसा क्रांती दल संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर इतरही अनेक राज्यात चालवित आहे.यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मा.मडावी साहेबांनी केले. बिरसा क्रांती दल, शाखा -बाभुळगांव चे वतीने रविवार दि.१९ नोव्हेंबर ला प्रबोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेला प्रमुख अतिथी राज्याध्यक्ष गिरिजाताई उईके, महिला फोरम, डि.बि.अंबुरे, राज्य उपाध्यक्ष, किरण कुमरे, राज्य महासचिव, उत्तमराव मानकर,से.नि.उप मुख्यकार्यकारी अधिकारी, राजु मडावी, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प.यवतमाळ,विष्णु कोवे,राज्य संघटक, प्रा.कैलास बोके,विदर्भ सचिव,यांची तर प्रमुख उपस्थिती रमेश भिसनकार, जिल्हाध्यक्ष, नामदेवराव पेंदोर, सुभाष मसराम,विलास चांदेकर.
वंदनाताई दोडंगे, शितलताई मडावी, मारोती गेडाम, प्रितीताई पांडे उपस्थित होत्या. परिषदेचे मुख्य आयोजन प्रविण वरखडे, कार्याध्यक्ष बि.के.डी.बाभुळगाव, दर्शना आत्राम,अर्पित उईके,विजेताताई वलके यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी भुराजी जुमनाके, देविदास पोयाम,कविता मडावी मारोती कसारकर,शंकर मंडाळे,अंकुश गेडाम, मनोज मडावी, किसन चतुर, किसन आडे,रविंद्र गाडेकर,गजानन जुमनाके, राजु चांदेकर.
निलेश मंडाळे, अंकुश ढोबरे यांनी परिश्रम घेतले. परिषदेला दिघी, करळगाव, तरोडा, पंचगव्हाण, गणोरी, उमरी, सुकळी, बाभुळगांव परिसरातील असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचे संचालन संजय मडावी, जिल्हा महासचिव यांनी तर आभार रमेश भिसनकार जिल्हाध्यक्ष यांनी मानले.