Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे आत्मविश्वास खूप वाढले आहे. त्यामुळेच आता नव्या मंत्रिमंडळात भाजप तीन महत्त्वाच्या खात्यांवर आपला दावा ठोकत आहे मात्र या खात्यांमुळे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ला सरकार चालविताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतरमहायुतीच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि महत्त्वाची खाती कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार याबाबत दर दिवशी नवनवीन माहिती समोर येत आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजप हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे.तर दुसरीकडे भाजप मंत्रिमंडळातील तीन महत्त्वपूर्ण खात्यांवर आपला दावा ठोकत आहे. याव्यतिरिक्त निवडून आलेल्या अनेक आमदारांचे डोळेही मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी लागले आहे.संधी मिळणार.सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकार-2 ने नव्या मंत्रिमंडळासाठी तिन्ही पक्षांसाठी 21-12-10 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे.
यामुळे महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला 21 मंत्री,शिवसेना शिंदे गटाला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फक्त 10 मंत्रीपदे मिळणार आहेत.एकूणच भाजपने स्वतः मोठा पक्ष आणि सर्वाधिक जागा असल्याने नव्या सरकारात सहकारी पक्षांवर वचक ठेवण्याच्यादृष्टीने जो फॉर्म्युला बनविला आहे,त्यात कॅबिनेट मधील अत्यंत महत्त्वाची 3 खाती भाजपकडे राहणार यावर लक्ष्य केंद्रित केले असल्याची चर्चा आहे.
हे असेल तीन खाते भाजपकडे.
भाजपने मुख्यमंत्रिपद मिळविल्यानंतर आता कॅबिनेट मधील महत्वपूर्ण खाते जे प्रशासनात पकड मजबूत बनवते अशी तीन महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.अर्थमंत्री,गृहमंत्री आणि सामान्य प्रशासन मंत्री या तीन महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने आपला दावा केला आहे. महायुती सरकार-1 मध्ये अर्थखाते अजित पवार यांनी घेवून ते स्वतःअर्थमंत्री होते. या माध्यमातून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मोठे आर्थिक पाठबळ पुरवले.याच बाबीमुळे शिंदे आणि भाजपचे आमदार पवार यांच्यावर नाराज राहायचे.
नव्या सरकारात भाजपने अर्थ खाते स्वत:कडे घेण्याची तयारी केल्याने पवार यांना अडचणीत ठेवण्याची ही रणनीती तर नाही न अशी चर्चा राजकीय स्तरावर होत विशेष म्हणजे भाजपकडे अर्थ खाते आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अर्थ खाते अजितदादा गटाला न देता महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खाते दिले जावू शकते अशीही चर्चा आहे.या व्यतिरिक्त भाजपकडे गृह खाते भाजपकडेच राहिल्यास राज्याचा नवा गृहमंत्री कोण होणार, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
भाजप अर्थ खात्यासाठी का आग्रही?.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळविण्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा मानल्या जात आहे.ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. ही योजना राबवण्यात अर्थखात्याचा सहभाग महत्त्वाचा होता. यामुळे अर्थमंत्री अजित पवार सर्वाधिक चर्चेत होते.मात्र,निवडणुकीत घोषित जाहीरनामा आश्वासनामुळे नव्या महायुती सरकारला लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला 2100 रुपये मोजावे लागणार आहेत.आणि राज्याच्या तिजोरीवरही प्रचंड ताण येणार,हे निश्चित आहे. त्यामुळे नव्या आर्थिक आव्हाने पेलून भविष्यात पुन्हा निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी भाजपची रणनीती आहे.
यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे अर्थखाते देण्यात येईल असा अंदाज सध्या बांधल्या जात आहे.याव्यतिरिक्त गेल्या टर्ममध्ये गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.पण राज्यात गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने गृहमंत्री म्हणून फडणवीस हे टीकेचे धनी झाले,पण याचा सामना करताना आता पुन्हा ते विरोधकांवर वचक राहावा यादृष्टीने फडणवीस मुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री सह गृहमंत्रालय ही स्वत:कडे ठेवू शकतात अशी शक्यता आहे.