Yellow Mosaic Virus: दारव्हयाच्या तालुका कृषी विभागाने शेतकरी सोडला वार्यावर.

Yellow Mosaic Virus: दारव्हयाच्या तालुका कृषी विभागाने शेतकरी सोडला वार्यावर.

तालुका प्रतिनिधी/दारव्हा चेतन पवार

Yellow Mosaic Virus: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची तसेच शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर योजनांची माहिती देणारी यंत्रणा ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची आहे. कृषी अधिकारी कार्यालयातूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दारव्हा येथील कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी पद प्रभारावर असल्याने तालुका कृषी कार्यालयाचा कारभार ढेपाळला आहे.ग्रामीण भागात कृषी सहाय्यकाची भेट होणे दुर्लभ झालेले आहे.त्यामुळे हे कार्यालय कुचकामी ठरले आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने कार्यालयाचा कारभार मनमर्जीने सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या उदासीन कार्यपद्धतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे.

कृषी कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांच्या लाभाच्या फळबाग,शेततळे, नाला बंदिस्त,कृषी अवजारे,ठिबक संच व तुषार संच अनुदान योजना राबविण्यात येतात. तसेच एकात्मिक किड नियंत्रण कार्यक्रम यासह अन्य शेतकरी हिताचे कार्यक्रम राबविले जातात.परंतु कृषी अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी हेच कार्यालयात मीटिंग, दौरा या कारणाने अनुपस्थित राहत असल्याने कुठल्याही कर्मचाऱ्यांवर जरब राहिलेला नाही.

परिणामी हम करे सो कायदा याप्रमाणे कर्मचारी वर्ग कार्यालयीन वेळेत कधीही आपल्या कामाच्या ठिकाणी आढळून येत नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा असलेला घटक हा कृषी सहाय्यक असतो.परंतु तालुक्यातील कृषी सहाय्यक हे गावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती देताना कधीच दिसून पडत नाही.कृषी विभागाच्या योजना गोरगरीब शेतकऱ्यांना न देता आपल्या मर्जीतील धनदांडग्यांना दिल्या जातात.

तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा प्रभार असल्याने दोन्ही कार्यालयात रामभरोसे काम सुरु आहे. यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे.अतिवृष्टीचे नुकसानीची रक्कम अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.पीक विमा कंपनीने अजूनही शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केलेले नाही.तसेच पीक विमा नुकसानीची मदत मिळालेली नाही.

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५०हजार मदतीची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.असे असताना नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने वाऱ्यावर सोडले आहे.

येलो मोझाॅक, बोंडअळीने शेतकरी बेजार.

निसर्गाच्या लहरिपणामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आला असताना सोयाबीन पिकावर येलो मोझाॅक व कापूस पिकावर बोंडअळी सारख्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे मात्र कृषी विभागाकडून या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून,दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 7 =