TRAI New Rule : देशात कोट्यावधी लोक मोबाईल फोन वापरतात.Mobile SIM CARD.यात अनेक लोकांजवळ एक किंवा दोन मोबाईल राहतात आणि त्यात एकापेक्षा जास्त सिम कार्ड राहतात. पण एकाच वेळी सर्व सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आर्थिक खर्च करावा लागतो.
सोबतच विविध वेळी यांना नियमित ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप आर्थिक पंचायत सुद्धा करावी लागते. दीर्घ कालावधीत सिम कार्ड वर रिचार्ज केला नाही तर त्या सिम कार्डची सर्व सेवा टेलिकॉम कंपन्या बंद करून टाकतात. यानंतर अशा सिम कार्ड ला पुन्हा एकटीव करण्यासाठी महागडे रिचार्ज करावे लागते.
मात्र आता ट्रायच्या नव्या नियमानुसार, फार कमी म्हणजे फक्त 20 रुपयात मोबाईल मधील सिम कार्ड नियमित ऍक्टिव्ह राहणार आहेत. दोन सिम कार्ड मोबाईल मध्ये ठेवण्यासाठी आता जास्त खर्च करावा लागणार नाही.
अधिकांश लोक आपल्या मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरतात यांची देशात मोठी संख्या आहे.आणि या सिम कार्ड सदैव ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी विविध शुल्काचे रिचार्ज करणे अनिवार्य आहे. कारण निर्धारित अवधीत किंवा व्हॅलिडीटी संपल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांकडून देणाऱ्या अवधीत जर रिचार्ज केला नाही, तर सिम कार्ड सेवा बंद पडते .यामुळे अनेक डबल सिम कार्ड युजर्स ना अधिक आर्थिक खर्च करावा लागतो.
या कारणांनी अनेक लोक आपला दुसरा कार्ड बंद करून ठेवतात. तर दुसरीकडे जुलै 2024 पासून टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान चे दर महाग केलेले आहे. यामुळेही अनेक लोकांना दुसरा सिम कार्ड वापरणे महागात पडत आहे.मात्र आता यासाठी कोणते नवे नियम बनविले आहे,ते आपण जाणून घेऊया.
टेलिकॉम रेगुलरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया ने सिम कार्ड ठेवण्यासाठी जे अधिक शुल्काचे रिचार्ज करावे लागते यावर काही बंधन घालून नियम बनवून दिले आहे. त्यामुळे आता फक्त वीस रुपये खर्च करून महिनाभर सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येईल.
- ट्रायच्या कंजूमर हँडबुक नुसार Consumer Handbook. जर सिम युजर्स आपला सिम 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस वापरत नसेल, तर तीन महिन्यानंतर असे सिम कार्ड निष्क्रिय मानले जातात,यावर संबंधित टेलिकॉम कंपन्यांकडून सेवा या काळानंतर बंद केल्या जातात.
- आता एखादी सिम कार्ड 90 दिवसापर्यंत वापरला नसाल तर,आणि त्यामध्ये आधीच प्रीपेड बॅलन्स असेल तर ते सिम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी राहावं यासाठी नवे नियम घालून दिलेले आहेत. यात 30 दिवसांची मुदत वाढविण्यासाठी प्रीपेड बॅलन्स मधून आधीच 20 रुपये कापले जातील.आणि यानंतर हा सिम डीएक्टिव्ह होणार नाही.
प्रीपेड बैलेन्स मधून शुल्क कापून Sim Card Active राहणार.
जर प्रीपेड बॅलन्स नसेल,तर सिम कार्ड पूर्णपणे 90 दिवसानंतर बंद केल्या जाते.यात व्हाईस कॉलिंग इन्कमिंग कॉल्स आणि इंटरनेट डाटा वापरणे कठीण होऊन जाते. मात्र आता अशा सिम कार्ड संबंधित नंबर रिसायकल होणार आहे. यात नवीन Sim युजर साठी Sim Active सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
यापुढे आता एखाद्या व्यक्तीने आपल्या मोबाईल मधील सेकंडरी सिम Secondary Sim Card कार्ड वापरात आणला नाही,तर त्यासाठी कंपनीकडून मेसेज किंवा प्रे अलार्म देण्याची गरज नसेल. असे सिम कार्ड समोर सुरू ठेवण्यासाठी 15 दिवसांचा अतिरिक्त वाढीव कालावधी राहणार आहे.
यादरम्यान सीम युजर्स आपला सिम कार्ड पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी कस्टमर केअर सोबत संपर्क साधू शकणार आहे,किंवा कंपनीच्या कस्टमर केअर वर किंवा मोबाईल एप वरून याची माहिती घेऊन ही सेवा पंधरा दिवसांसाठी सुरू ठेवू शकतात.
TRAI चा नवा ऍप ‘संचार साथी’.
यासंदर्भात टेलिकॉमिनिस्ट्रीने ट्रायच्या TRAI नियमाखाली सार्वजनिक जनजागरण सुरू केली आहे.सोबतच, सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्याची कालावधी आणि लागणाऱ्या शुल्क संदर्भात ‘संचार साथी’ Sanchar Saathi एप्लीकेशन नुकतेच लॉन्च करण्यात आलेले आहे.या संदर्भात टेलिकॉमिनिस्टर ज्योतीरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 सुरू करताना याची घोषणा केली आहे.
BSNL चे मिशन 2.0 काय?
दरम्यान बीएसएनएलच्या या मिशन 2.0 BSNL Broadband Internet Service बाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी याची प्राथमिक उद्दिष्टे सांगताना देशात प्रत्येक 100 घरापैकी किमान 60 घरांना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळावी हे सुनिश्चित करणे असल्याची माहिती दिली.
बीएसएनएल या मिशन मधून ग्रामीण भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचविण्याचे काम करीत आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानादरम्यान वर्ष 2030 पर्यंत भारतात एकूण 2.70 लाख गावांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी चा विस्तार केल्या जाणार आहे.
यात ग्रामीण भागातील सर्व सरकारी शाळा, प्राईम मध्ये हेल्थ सेंटर अंगणवाडी केंद्र तसेच पंचायत कारल्यासारख्या ९०% सरकारी संस्थांना बीएसएनएलच्या ब्रॉडब्रँड ने जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे.