Tomb Of Aurangzeb : देशात सगळीकडे सध्या छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल बादशाहह औरंगजेब यांचा ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक घटनाक्रम खूप चर्चेत आहे.
छावा या चित्रपटाने देशात मराठा साम्राज्याची ऐतिहासिक शौर्यगाथा आठवणीत आणली आहे.यात त्या काळातील मुगल सम्राट औरंगजेब याच्या चारित्र्याचा उल्लेख महत्त्वाचा झालेला आहे कारण मराठा शौर्यकाळात औरंगजेब भारत देशात मराठ्यांच्या सत्तेला संपवण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न केले.
त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने औरंगजेबाचा इतिहास पुन्हा चर्चेत आहे.उल्लेखनीय म्हणजे छत्रपती संभाजी यांचा वाढ घडवून आणणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेब याची कबर मराठ्यांचे स्वराज्य असलेले महाराष्ट्रातील पुर्वाश्रमीचे औरंगाबाद अर्थातच आता छत्रपती संभाजी नगर नजीक खुलदाबाद येथे आजही अस्तित्वात आहे.
छत्रपती संभाजी महाराजानी औरंगजेबच्या एकछत्र राज करण्याच्या योजनेला कधीच यशस्वी होऊ दिले नाही.
महाराष्ट्रात स्वराज्य असलेले मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात अख्ख्या भारतात प्रभुत्व होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल सम्राट औरंगजेब याच्या भारतावर एकछत्र राज करण्याच्या योजनेला आपल्या जीवन काळात कधीच यशस्वी होऊ दिले नाही.
तर औरंगजेबाने मराठा साम्राज्यावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या मृत्यूनंतर त्याला याच महाराष्ट्राच्या भूमीत दफन करण्यात आले.मुगल सम्राट असलेल्या औरंगजेबाला मुघलांची राजधानी असलेल्या दिल्ली एवजी महाराष्ट्रात अगदी साधी कबर बांधण्यात आली.
इतिहासात असे का घडले हे आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
Tomb Of Aurangzeb : औरंगजेबाची इच्छा होती महाराष्ट्रात दफन व्हावयाची.
मुगल सम्राट आलमगीर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजी नगर शहरात अगदी नाजूक असलेल्या खुलताबाद येथे आजही अस्तित्वात आहे.संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणी औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याला येथे दफन करण्यात आले होते.या संदर्भात ऐतिहासिक नोंदी सुद्धा आहेत.
त्यानुसार औरंगजेबाने मराठा साम्राज्याच्या या भागात आपल्या वास्तव्यादरम्यान आपल्या मृत्यूपूर्वी स्वतःचे मृत्युपत्र लिहून ठेवले होते.यामध्ये त्याने आपल्या मृत्यूपूर्वी काय इच्छा आहेत ते स्पष्टपणे यात नमूद केले आहे.आलमगीर औरंगजेबने आपल्या मृत्यूनंतर काय करायचे,ह्या बाबी आपल्या मृत्युपत्रात खाली दिल्याप्रमाणे नमूद केले होते
“माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ आयोजित करू नये,कोणताही संगीत किंवा शोकसभा आयोजित होऊ नये,मृत्यूनंतर माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये,माझी कबर साधारण चौथऱ्याप्रमाणे एखाद्या उघड जागेत असावी,तेथे कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये” असे त्याने आपल्या मृत्युपत्रात नमूद केले होते.
त्याच्या मृत्यूनंतर इच्छेनुसारच त्याची कबर खुलताबाद येथे बनविण्यात आली. आजही या ठिकाणी औरंगजेबाची कबर अगदी साध्या पद्धतीने बांधलेली दिसते.त्या इतिहास काळापासून आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीवर कोणत्याही प्रकारचा समारंभ होत नाही,किंवा कोणतेही भव्य स्मारक बांधण्यात आले नाही.
हा आहे भाषा औरंगजेबाचा इतिहास.
भारतात एक छत्र राज्य करण्याचा स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेबाचा जन्म इसवी सन १६१८ मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये संभाजीनगर{ तत्कालीन औरंगाबाद शहर} मध्ये झाला.
मोगल साम्राज्यात राज करीत असताना औरंगजेबाचा आणि या भागाचा विशेष असा संबंध होता असे मानले जाते.कारण इसवी सन 1636 ते 1644 या ऐतिहासिक काळात औरंगजेब या प्रांताचा सुभेदार होता.
त्याला दौलताबाद हा प्रदेश प्रशासकीय कामकाजासाठी केंद्र म्हणून देण्यात आलेला होता,पण खुलदाबाद हा भाग औरंगजेबला जास्त आवडल्याने त्याने आपली प्रशासकीय शहर येथे हलवून घेतला.
कालांतराने औरंगजेब हा बादशाह झाला.यानंतर आपल्या साम्राज्य विस्तारत मुघल बादशाह औरंगजेबाने मराठ्यांचे स्वराज्य संपण्यासाठी अनेक आटोकाट प्रयत्न केले.यादरम्यान त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अमानवीय असे अत्याचार केले,आणि त्यांना अगदी हाल हाल करून ठार केले.हा ऐतिहासिक घटनाक्रम आजही प्रत्येक मराठा हृदयात टीस उठविणारा आहे.
काय नाव आहे औरंगजेबाच्या कबर वर?
छत्रपती संभाजी नगर जवळ असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबाची जी बांधलेली कबर आहे,त्याच्या कबरीवर एक दगड लावलेला आहे.त्याच्यावर औरंगजेबाचे पूर्ण नाव “अब्दुल मुझफ्फर मोहीयुद्दीन औरंगजेब आलमगीर” असे लिहिलेले आहे.या ठिकाणी आजही कोणतीही मोठी वास्तू नव्हे,फक्त साधारण चौथर्यासारखी कबर दिसते.
नुकतेच प्रसारित झालेला छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा प्राचीन इतिहास उलगडला जात असताना,सध्या महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाच्या इतिहासाबाबत चर्चा रंगलेली आहे.त्याने संभाजी महाराजांचा केलेला अमानवीय वध आणि संभाजी महाराजांचा मराठा साम्राज्यासाठी बलिदान,मराठा इतिहासात सर्वात वेदनादायी पण स्वाभिमानास्पद क्षण मानला जातो.औरंगाबाद द्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानवीय छळ इतिहास प्रत्येक मराठा हृदयाला आजही वेदना देणारा आहे.