Succese News : जन्मापासून आंधळे पण बनले शासकीय शाळेचे प्रिन्सिपल.
जीवनात किती कठीण प्रसंग आले आणि देवाने काही शारीरिक कमी दिली तरीही मनुष्य आपल्या प्रयत्नाने काहीही साध्य करू शकते हे राजस्थान मधील भीलवाडा येथील वसंतकुमार भंडारी यांनी आपल्या कठीण जीवनातून सर्वांना दाखवून दिले आहे.जन्मापासून वसंत भंडारी यांना डोळ्याने दिसत नव्हते ते जन्मतः आंधळे आहेत. लहानपणापासून ते डोळ्यांनी अधू असल्याने कुटुंब आणि इतर लोक त्यांना त्याने मारत होते. पण जीवनातील अनेक कठीण प्रसंगावर मात करून आणि अभ्यासात कठोर परीश्रम करून वसंतकुमार भंडारी तसरकारी शाळेत प्रिन्सिपल बनले आहेत.
त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाच्या दिव्यांग लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.
जीवनात येणाऱ्या विविध कठीण संकटाचा सामना करण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा तंत्र असतो पण काही लोक असे असतात की जे स्वतःची कमी दूर करण्यासोबतच इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतात.वसंत कुमार भंडारी यांनी आपल्या आंधळेपणावर मात करून शिक्षणरुपी प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात भरण्याचा लक्ष समोर ठेवला आहे. आता ते लहान मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्यासाठी काम करीत आहेत.
अशी ही वसंतकुमार भंडारींची कहाणी.
वसंतकुमार भंडारी हे मूळचे भिलवाडा येथील रहिवासी. ते जन्मापासून डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. पण आपल्या जीवनात त्यांनी ही शारीरिक कमतरता आपल्या जीवनमार्गात कधीच अडसर होऊ दिली नाही. आंधळे असल्याने कुटुंबाची गरज त्यांना होती. पण शिक्षणासाठी आणि जीवनयापण साठी ते सलग १८ वर्षे घरापासून दूर राहीले. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि आज वसंतकुमार भिलवाडा येथे सरकारी शाळेचे प्राचार्य आहेत. आता ते फक्त शाळेतील मुलांचे भविष्य घडवत नाहीत, तर त्यांच्या संघर्षमय जीवनकथेची विद्यार्थ्यांना प्रेरणाही देत आहेत.
लोकांचे टोमणे मिळाले,पण त्यांचे बळात रूपांतर केले.
वसंत कुमार सांगतात, लहानपणी लोक त्यांना आणि आई-वडिलांना वसंत हे आंधळे असल्याने टोमणे मारायचे. ते अंध असल्याने आपल्या आयुष्यात काही करू शकणार नाही, असे टोमणे त्यांना मिळत होते. पण या टोमण्यांना त्यांनी आपल्या ताकदीत परिवर्तन करण्यासाठी खूप संघर्ष केले,याला जवाब म्हणून त्यांनी आपल्याला आयुष्यात काही तरी मोठे करून दाखवायचे हा लक्ष्य ठेवला होता.जीवन जगताना सर्व कामे करायला त्यांना अडचण जात होती.शिक्षण सुरू केल्यानंतर अभ्यासासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.शालेय आणि महाविद्यालयीन दिवसात त्यांना पायऱ्या चढताना आणि उतरताना खूप त्रास झाला, पण त्यांनी जीवनात कधीच हार मानली नाही.सर्व अडचणींना तोंड दिले. कठीण परिश्रमातून आज वसंतकुमार भंडारी यशस्वी शिक्षक आणि सरकारी प्राचार्य आहेत.
लहानपणी छतावरून पडले.
वसंत कुमार यांच्या जीवनात एक वेळ अशी आली होती की,ते जीवनाचा त्याग करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले होते. आपल्या घरात बांधकामाचे काम सुरू असताना ते घराच्या छतावरून खाली पडले,अन् गंभीर जखमी झाले.आधीच जीवनात डोळे नसल्याने अंधार होता,आता अपंग झाले तर आयुष्याचे काय होणार ही चिंता त्यांना सतावत होती,यात एक वर्ष पूर्णपणे ते निराश झाले.मात्र आपल्या पालकांच्या मदतीने त्यांनी पुन्हा जीवनात धैर्य आणत पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.आणि सरकारी शाळेचे मुख्याध्यापक झाले.
वसंतकुमार यानी शिकविलेले अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीला लागले.
वसंत कुमार यांच्या शाळेतल्या मुलांना त्यांच्या संघर्षाची कहाणी माहिती होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्याकडून शिकलेले अनेक मुले आज शिक्षक आणि मोठ्या पदांवर आहेत अनेक मुलांना सरकारी नोकऱ्या लागल्या ते आपल्या यशाचे श्रेय पालकांसोबतच आपल्या शिक्षकांमध्ये देतात.वसंत कुमार यांचे सहकारी राजकुमार स्वर्णकर यांच्या मते वसंत कुमार सारखा शिक्षक त्यांनी कधीच पाहिला नाही. अंध असूनही आपले सर्व कामे स्वत: करतात आणि इतरांनाही शिक्षणासोबतच प्रेरणा देतात.