SIM Card Active : आज काल मोबाईल फोन मध्ये दोन सिम कार्ड वापरले जात आहे, मात्र सर्वसामान्य मोबाईल धारकांना एकाच वेळी मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड रिचार्ज करणे परवडण्यासारखे नसते, तर दुसरीकडे कंपन्यांचे रिचार्ज महागले आहे.
अशात निर्धारित अवधीत सिम कार्ड रिचार्ज न केल्यास सिम ऍक्टिव्ह राहत नाही,टेलिकॉम सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्या असे सिम कार्ड डी ऍक्टिव्हेट करून टाकतात,मात्र आता दोन सिम कार्ड वापरत असाल तर TRAI (टेलिकॉम रेगुलरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया) कडून सिम कार्ड ऍक्टिव्हेशन संबंधात महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला आहे.
सिम कार्ड ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी त्याच्यात 20 रुपये असणे गरजेचे आहे,असे TRAI ने स्पष्ट केले आहे.त्याशिवाय सिम कार्ड 90 दिवस ऍक्टिव्ह राहणार नाही असे ट्रायने आपल्या आदेशात म्हटले आहे.
अनेक लोक मोबाईल मध्ये एक किंवा दोन सिम कार्ड वापरत असताना, सिम कार्ड रिचार्ज न करता एकूण किती दिवस ऍक्टिव्ह राहू शकते असे प्रश्न त्यांच्यासमोर येतात.या मुद्द्यावर चर्चा होत असताना ट्रायने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणताही रिचार्ज न करताही 90 दिवस सिम कार्ड ऍक्टिव्हेट राहू शकते, रिचार्ज केल्याशिवाय 90 दिवस टेलिकॉम कंपन्या सिम कार्ड सेवा बंद करणार नाही असा दावा करणारा कोणताही आदेश TRAI ने यासंदर्भात टेलिकॉम कंपन्यांना Telecom Companies In India दिलेले नाही असे याबाबत स्पष्ट केले आहे.
सिम कार्ड ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी 20 रुपये बॅलन्स अनिवार्य.
समोर आलेल्या ट्रायच्या रिपोर्टनुसार या संदर्भात जे चर्चा सुरू आहे,त्यात सिम कार्ड धारकांनी टेलिकॉम सेवा घेण्यासाठी 90 दिवस कोणत्याही प्रकारच्या रिचार्ज प्लान घेतला नाही तर सिम कार्ड ऍक्टिव्हेट राहते अर्थातच 90 दिवसांसाठी कोणताही रिचार्ज करण्याची गरज उरत नाही या संदर्भात TRAI ने आपल्या एक्स हॅण्डल वर याबाबत पोस्ट केली आहे.
यात सिम ॲक्टिवेट ठेवण्यासाठी किमान 20 रुपये बैलेंस असणे बंधनकारक आहे असे TRAI ने सांगितले आहे.सोबतच यामध्ये फेक्ट चेक करून टेलिकॉम कंपनीकडूनही 90 दिवस SIM एक्टिवेशन संदर्भात कोणताही दावा करण्यात आलेला नसल्याचे सांगितले आहे.
सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी नवे नियम असून यासाठी वीस रुपये बॅलन्स असणे बंधनकारक आहे,असे ट्राय ने म्हटले आहे. जर रिचार्ज खात्यात 20 रुपये बॅलन्स नसले तर ट्राय कडून ही कारवाई करण्यात येईल आणि सिम धारकाचे सिम कार्ड निष्क्रिय होईल.
11 वर्षांपूर्वीपासून ट्रायद्वारे याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सिम ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी किमान बॅलन्स असणे आवश्यक आहे.तर टेलिकॉम कंपन्यांना व्हॉईस कॉल सेवा देण्यासाठी Voice Only Plans आनण्यास सांगितले आहे,टेलिकॉम कंपन्या यावर अंमलबजावणी करणार असेल तर त्यांनाही सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहे.
Voice calls आणि SMS सेवेसाठी नवे प्लान आणण्याचे आदेश.
या संदर्भात टेलिकॉम रेगुलीरिटी अथॉरिटी ऑफ इंडियाने जे आदेश दिले आहेत.त्यात टेलिकॉम कंपन्याना इंटरनेट न वापरणाऱ्या सिम धारकांना Voice calls आणि SMS सेवा मिळावी या उद्देशाने नवे प्लान आणण्याचे आदेश दिले होते.
त्यावर टेलिकॉम कंपन्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.या प्लॅनमुळे Sim Users ना व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस साठी रिचार्ज करता येणार आहे, इंटरनेट डाटा बेनिफिट घेण्यासाठी यात वेगळे रिचार्ज करावे लागते,मात्र ज्यांना फक्त व्हाईस कॉलिंग करायची आहे, त्यांना टेलिकॉम कंपन्या इंटरनेट डाटा संदर्भात रिचार्ज प्लान मधून सक्ती करू शकत नाही.
यासाठीच TRAI च्या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्यांनी आपले नवे रिचार्ज सादर केले आहे. त्यामुळे आता इंटरनेट डाटा न घेता व्हॉईस कॉल सेवा मिळेल,पण आपला सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी त्यात नेहमी किमान 20 रुपये बॅलन्स फोन मध्ये ठेवायला हवे,असे TRAI ने स्पष्ट केले आहे,यामुळे सिम कार्ड सेवा बंद पडणार नाही.