*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर कपाशी पिके धोक्यात.
कापसाला भाव नाही, अस्मानी संकट जगू देत नाही; शेतकरी राजा हवालदिल.
दारव्हा शहर आणि तालुक्यात बऱ्याच भागात काल मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने अनेक भागात चिखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवताना दिवसभर कसरत करावी लागली.
या पावसामुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यात काल रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २: ३० वा. पासून अवकाळी पावासाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.काल पासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून,आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना,फळबागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठ नुकसान झालं आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली.
याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसानं भर घातल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया गेले आहे.