महाराष्ट्रातील 2 बँकांना आता लागणार कुलूप.नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला देशभरातील अनेक बँकांवर RBI ने सणसणीत अशी कारवाई केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने देशभरातील 11 बँकांचे लायसन्स रद्द केले आहे.आरबीआयच्या या नवीन निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील 2 मोठ्या बँकांना कुलूप लागणार आहे.आरबीआयने 2024 मध्ये देशातील 11 बँकांचे लायसन (license) रद्द केले आहे.
RBI कडून देशभरात बँकिंग क्षेत्रासाठी आमुलाग्र बदल करण्यात येत असून अनेक नवीन नियम नवीन वर्ष 2025 मध्ये लागू होणार आहे. मात्र यापूर्वी ज्या बँकांनी रिझर्व बँक इंडियाकडून बनविलेल्या नियमांचे उल्लंघन केले,त्यांचे वर्ष सरते शेवटी आरबीआयने थेट लायसन्सच रद्द केलेले आहे. यात 11 बँकांच्या समावेश आहे, तर अनेक बँकांवर आरबीआयने दंडात्मक अशी कारवाई केलेली आहे,यामुळे देशभरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ माजलेली दिसत आहे.
2024 या आर्थिक वर्षात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या देशभरातील किती बँकांवर का कारवाई करण्यात आली? याबाबत आपण माहिती जाणून घेऊया.
भारतात चलनी नोटांचे व्यवस्थापन, आणि देशभरात बँकिंग सेक्टर चे संचालन करणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अनेक कडक नियम बनविले आहेत. वेळोवेळी RBI नियमांचा पालन होत आहे किंवा नाही,यावर करडी नजर ठेवून असते. तर दुसरीकडे सर्व राष्ट्रीयकृत खाजगी आणि सहकारी बँकांना RBI चे नियम पाळणे बंधनकारक असते जे बँका नियम पाळत नाहीत त्यांच्यावर आरबीआय कडून परवाने रद्द किंवा दंडात्मक कारवाई करते. अशाच प्रकारे Reserve Bank of India कडून गेल्या काही महिन्यात भारतात 11 बँकांची लायसन्स रद्द करण्यात आले आहेत.यामध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांचाही समावेश आहे.
या बँकांचे RBI ने केले लायसन्स रद्द.
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यात देशभरात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र आणि आसाम असे मिळून एकूण 11 सहकारी आणि खाजगी व्यवस्थापन असलेल्या बँकांवर लायसन्स रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.या बँकांकडून RBI द्वारे ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले होते. यासंदर्भात RBI ची चौकशी आणि निरीक्षणातून या बँकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी थेट कारवाईसाठी लायसन्स रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
यामध्ये
1)महाराष्ट्रातील वसमत नगर येथील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक लिमिटेड.
2)मुंबई येथील द सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड.
या 2 बँकांचे लायसन्स RBI ने रद्द केलेले आहे.
याव्यतिरिक्त देशभरातील इतर विविध राज्यातील 9 बँकांचे प्रमाणे RBI ने रद्द केलेले आहे.
यामध्ये
- दुर्गा को-ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड, विजयवाडा, आंध्र प्रदेश.
- श्री महालक्ष्मी मर्केंटाइल को-ऑप.बँक लिमिटेड, दाभोई, गुजरात.
- द महाभैरब को-ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड, तेजपूर, आसाम
- द हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड हिरीयुर, कर्नाटक.
- शिम्शा सहकारी बँक नियमित, मद्दूर, मंडया, कर्नाटक
- उरावकोंडा को-ऑपरेटिव टाउन बँक लिमिटेड, आंध्र प्रदेश
- सुमेरपुर मर्केंटाइल अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, सुमेरपूर, पाली राजस्थान.
- पूर्वांचल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, गाजीपूर, यूपी
- बनारस मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, वाराणसी.
या बँकांचे 11 बँकांचे परवाने (लायसन्स) रद्द झाले आहे.
ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश मात्र बँका होणार नेहमीसाठी बंद.
RBI कडून झालेल्या या बँकांवर थेट कारवाईमुळे आता त्यांना बँकिंग व्यवसाय करता येणार नसून तेथे कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नाही. मात्र या बँकेमध्ये ठेवीदारांचे जे पैसे आहेत, त्यांना ते परत करण्याची जबाबदारी या बँकेची राहणार असून,यासाठी RBI ने ठेवीदारांना पैसे मिळावे यासाठी परवाने रद्द झालेल्या या बँकांना निर्देश दिलेले आहे.त्यामुळे ठेवीदारांचे 5 लाख रुपये पर्यंतची रक्कम परत मिळणार आहे.
तर यापेक्षा ज्यांची जास्त रक्कम आहे त्यांनाही फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. यामुळे या बँकांमध्ये यांचा जास्त पैसा आहे,अशा ठेवीदारांना यामुळे मोठा आर्थिक झटका बसताना दिसत आहे.या सहकारी बँकांनी आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने,तसेच बँकांच्या चुकीचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर ही कडक कारवाई झाली आहे.मात्र ठेवीदारांचे यामुळे नुकसान होऊ नये,याची खबरदारी घेतली गेली आहे.
यासाठी RBI ने या बँकांना त्यांच्या ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी कडक सूचना केलेले आहे.मात्र या बँकांमध्ये ज्यांचा जास्त निधी ठेविमध्ये होता आणि या बँकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे त्यांचे पैसे या बुडणार असल्याने असे ठेवीदार आर्थिक चिंतेत आले आहे.
त्यामुळे आता या संदर्भात आरबीआय पुढे काय निर्णय घेणार,याकडे अशा ठेवीदारांचे आता लक्ष लागलेले आहे मात्र आता आरबीआयच्या या लायसन्स रद्द करण्याच्या कारवाईमुळे देशातील विविध राज्यातील या 11 बँकांना कुलूप लागणार हे नक्की झाले आहे.