RBI New Guidelines : देशात मोठ्या प्रमाणात नियमित होणारी बँकिंग दरम्यान बँक ग्राहकांना ऑनलाइन आणि डिजिटल स्वरूपात फसवणुकीच्या घटना होत आहेत. विविध ठगबाज फ्रॉड कॉल करून बँक ग्राहकांना बँकेच्या नावावर फेक कॉल करून आर्थिकरीत्या फसवणुक करीत आहेत.त्यामुळे सायबर क्राईम मध्ये वाढ झालेली आहे.
आता अशा घटनांवर प्रतिबंध लावण्यासाठी देशाची सर्वात मोठी आर्थिक संचलन करणारी बँक भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून या संदर्भात नवीन नियम आणि गाईडलाईन बनविण्यात आले आहे.त्यामुळे आता बँकिंग ग्राहकांना कोणत्याही बँकेतून फक्त 2 सिरीज नंबर वरूनच बँकेचे अधिकृत कॉल येणार आहे.
त्यामुळे बँकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आणि विविध स्तरावर सर्व नागरिकांना मोबाईलवर येणारे प्रमोशनल कॉल्स समस्येमुळे मुक्ती मिळणार आहे.या संदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडिया ने मोठा निर्णय घेतला आहे यामुळे बँक आणि बँक ग्राहकांना सुविधा होणार आहे.
Scammers पासून बचावासाठी RBI कडून महत्त्वाचा निर्णय.
RBI ने यासाठी बँकाकरिता नवे नियम बनविले आहे.नुकतेच RBI द्वारे देशात सर्व राष्ट्रीय,खाजगी बँका आणि वित्तीय संस्थांना फोन नंबर सीरीज 1600 आणि 140 हे दोन सुरुवातीचे क्रमांक बँक आणि बँकिंग ग्राहकांमध्ये आर्थिक व्यवहार, मार्केटिंग कॉल आणि SMS साठी वाटप केले आहेत.
स्कॅमर्स Scammers पासून बँका आणि बँक सेवा Users व्यक्तींचे संरक्षण करणे हा या RBI उपक्रमाचा उद्देश आहे. या दोन क्रमांक व्यतिरिक्त येणारे सुरुवातीच्या क्रमांकामुळे बँकेकडून Calls, SMS येत आहे किंवा नाही हे पटविणे सहज होणार आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी RBI चा हा निर्णय सुविधाजनक आहे.
(RBI New Guidelines) RBI चे निर्देश.
- आरबीआयने शुक्रवार 18 जानेवारी 2025 रोजी सर्व बँकांना आपल्या ग्राहकांना आर्थिक फसवणूकीपासून टाळण्यासाठी आणि ग्राहकांना व्यवहाराच्या उद्देशाने कॉल करण्यासाठी फक्त 1600xx’ फोन नंबरिंग मालिकाच वापरण्यास सांगितले आहे.याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
- या संदर्भात आरबीआय ने म्हटले आहे की, प्रचारात्मक हेतूंसाठी, बँका आणि इतर नियमन केलेल्या वित्तीय संस्थांनी (REs) व्हॉईस कॉल आणि एसएमएस वापरून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी फक्त ‘140xx’ क्रमांकाची मालिका वापरावी.यासाठी बँका आणि इतर नियमन केलेल्या संस्थांना देखील आपल्या ग्राहक डेटाबेसचे निरीक्षण आणि त्याला अपडेट करण्यास सांगितले आहे.
बँकिंग क्रमांकाना अधोरेखित करणे गरजेचे,RBI चे परिपत्रक जारी.
सध्या देशात डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.या दरम्यान बँक आणि ग्राहकांना सुविधा आणि कार्यक्षमतेची ऑफर देताना, इतर Scammers याचा अनुचित लाभ घेत असल्याने फसवणुकीतही वाढ झाली आहे,यावर ठोस कारवाई,बँकिंग सेक्टर आणि बँक ग्राहक सुरक्षित राहावे यासाठी अधिकृत बँकिंग क्रमांकाना अधोरेखित करणे गरजेचे आहे. असे रिझर्व बँकेने आर ई एस ( REs )ला दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सध्या ग्राहकाकडून वापरला जाणार मोबाइल क्रमांक हा सर्वव्यापी ओळखकर्ता म्हणून उदयास आला आहे,बँक खाते प्रमाणीकरण आणि पडताळणी E-KYC प्रक्रियेत अधिकृत मोबाईल नंबर हा महत्त्वाचा असतो.मोबाईल नंबर मधून बँक आणि ग्राहकांमध्ये संवेदनशील असा आर्थिक व्यवहार होत असतो.यात OTP, व्यवहार सूचना आणि बँक खाते अपडेट प्रक्रिया महत्वाची असते.यामुळे रिझर्व बँकेचे सुरुवातीचे दिलेले क्रमांक निर्णय महत्वाचे आहे.
अशी मिळणार सुविधा.
- रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकिंग ग्राहकांचे व्यवहार आणि त्यांना मार्केटिंग कॉल करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांना वरील दोन फोन नंबरची सिरीज सुरू केली आहे. यामुळे बँक ग्राहकांना आता रिझर्व बँकेने ठरविलेल्या या दोन सिरीज नंबर मधूनच बँकांकडून कॉल येतील.या निर्णयामुळे बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर धारकांना स्कॅमर्स आणि फ्रॉड कॉल पासून बचाव होणार आहे.आरबीआयच्या या निर्णयाच्या सूचनेनुसार आता बँकांना आपल्या बँकिंग ग्राहकांना सर्व व्यवहार संबंधित कॉल साठी फक्त “1600” क्रमांकाने सुरु होणारे फोन नंबर वापरावे लागणार आहे.
- बँक ग्राहकांनी कोणताही बँकिंग व्यवहार केला असेल आणि त्यासाठी बँकेकडून कॉल आला असेल तर तो फक्त सोळाशे सिरीज पासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरूनच येईल.
- व्हॉइस कॉलिंग चे स्थितीत येणारा सिरीजचा क्रमांक हा बँकिंग साठी आहे किंवा नाही हे आता बँकिंग ग्राहकांच्या लक्षात लवकर येईल. यामुळे आर्थिक फसवणुकीसारखी प्रकरणे थांबविण्यास मदत मिळणार आहे,असा विश्वास आरबीआय ने दर्शविला आहे.
- विशेष म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून जे निर्देश देण्यात आले आहे,त्यात आता बँकांना आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस सेवा देताना फक्त “140” पासून सुरु होणारे क्रमांक वापरावे लागतील.बँकिंग मार्केटिंग आणि एसएमएस साठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने वरील क्रमांक बँकिंग सेक्टर साठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.”140″पासून सुरु होणारे क्रमांक मधूनच आता बँकिंग ग्राहकांना क्रेडिट कार्ड पर्सनल लोन विमा सेवा साठी बँकेतून कॉल येणार आहे.
- बँक ग्राहकांचे मोबाईल नंबर घोटाळेबाजांकडून विविध प्रकारची ऑनलाइन आणि इतर फसवणूक करण्यासाठी अनेक मार्गांनी गैरवापर देखील केला जाऊ शकतो,” असे परिपत्रक ‘व्हॉइस कॉल आणि एसएमएस नियामक प्रिस्क्रिप्शन आणि संस्थात्मक सुरक्षेचा वापर करून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून बचाव’ या गाईडलाईन मध्ये RBI ने सांगितले आहे.त्यामुळे रिझर्व बँकेने सर्व REs ला 31 मार्च 2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत या सूचनांचे तात्काळ पालन सुनिश्चित करण्यास सांगितलेले आहे.
असा आहे बँकांच्या नावाने आर्थिक फसवणुकीसंदर्भात आरबीआयचा वार्षिक अहवाल.
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI मी नुकतेच आपले वार्षिक अहवाल सादर केले आहे. देशात आर्थिक वर्ष 2024 मध्ये बँकिंग फसवणुकीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, फ्राड कॉल करून बँक ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने बँकेकडून कॉल करण्याची माहिती देऊन आर्थिक फसवणूक, फेक कॉल करून आर्थिक व्यवहारासाठी बँक ग्राहकांकडून ओटीपी मागून आर्थिक फसवणूक करणे, स्कॅमर्स द्वारे बँक ग्राहकांची आर्थिक फसवणूक,अशा विविध पद्धतीतून वर्ष 2024 मध्ये एकूण 36 हजार 73 बँकिंग फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वी यासंदर्भात आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार वर्ष 2020 मध्ये 8703 यानंतर 2021 या आर्थिक वर्षात 7 हजार 338 आणि 2022 मध्ये बँकिंग फसवणुकीच्या घटना 9 हजार46 पर्यंत वाढत गेल्या. यादरम्यान मागील पंचवार्षिक मध्ये 2024 मध्ये सर्वाधिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे बँकिंग सेक्टर आणि बँक ग्राहकांमध्ये अशा फेक कॉलमुळे चिंतेचे वातावरण होते.त्यामुळे बँकांसाठी सुरुवातीचे क्रमांक सीरीज बँकांसाठी सुरू करून आता आरबीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
TRAI कडूनही बँकांना सूचना.
Trai कडूनही बँकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.आता बँकांकडून operetional कॉलिंग साठी फक्त 1600xx’ नंबरिंग सिरीज वापरून व्यवहार/सेवा कॉल करा; ‘140xx’ नंबरिंग सिरीज वापरून केवळ फोन नंबरद्वारे प्रचारात्मक व्हॉइस कॉल करण्याचे,आणि व्यावसायिक संप्रेषण पाठवण्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा’ असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) द्वारे,” RBI कडून जारी केलेल्या गाईडलाईन नुसार म्हटले आहे.