Rajmata Jijau Free Cycle Scheme : महाराष्ट्र सरकारने या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ते म्हणजे राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेली मोफत सायकल वाटप योजना. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना विशेषकर ग्रामीण भागात शाळा कॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अमलात आणली जात आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी ही मोफत सायकल योजना एका प्रकारे शिक्षणासाठी वरदान ठरताना दिसत आहे.महाराष्ट्र शासनाचे या योजनेमागे मुख्य उद्देश्य,ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि शाळेत जाण्यासाठी प्रवास करताना मदत करणे होय.
महाराष्ट्र सरकारकडून “राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप” योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेत विद्यार्थिनींना फक्त वाहतुकीची सोय उपलब्ध करणे नसून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांतीचे प्रभावी माध्यम आहे.
उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अध्यापही सार्वजनिक वाहतुकीची साधने नाहीत. ज्या ठिकाणी आहेत ती मर्यादित आहेत, आणि ज्या ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत नाहीत,अशा ठिकाणी सरकारची ही सायकल वाटप योजना महत्त्वाची ठरणार आहे.
- आजही ग्रामीण भागातील विशेषकर विद्यार्थिनींना आपल्या शाळेत जाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर पायीच चालून जावे लागते. त्यामुळे सरकारची ही मोफत सायकल वाटप योजनेचा विद्यार्थिनींना लाभ मिळाल्यास त्यांना शाळेत जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून शारीरिक थकवा न येता शिक्षणात त्यांचा मन शिक्षणात लागेल.
- महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता आणि निकष ठेवले आहे.यात काही कागदपत्रे दाखल करावी लागते.विशेष म्हणजे इयत्ता 8 वी ते 12 वीत शिकणाऱ्या मुलींसाठी राज्यात ही योजना विशेषत्वाने लागू करण्यात आलेली आहे
- मोफत सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 वी ते बारावीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनी आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी त्यांच्या घरापासून शाळेचे अंतर किमान 5 किलोमीटर असणे आवश्यक आहे.
- शासन अशा प्रत्येक पात्र विद्यार्थिनींना 5000 रुपये पर्यंत किंमतीची सायकल घेण्यासाठी आर्थिक मदत करते.
- यात पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना 3 हजार 500 रुपये,आणि दुसऱ्या टप्प्यात 1500 रुपये हे सायकल खरेदीनंतर दिले जाते.
अर्जदार पात्र लाभार्थी विद्यार्थीनीचे मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण आवश्यक.
या सायकल वाटप योजनेचे लाभार्थी निवड करताना, पात्र लाभार्थी आणि निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी कडे लक्ष दिले जाते.विशेषकर डोंगराळ आणि दुर्गम भागात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी,आणि ज्या भागात शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत, किंवा तेथे रस्ते सुस्थितीत नाहीत,अशा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप योजनेत प्राधान्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पात्र लाभार्थी विद्यार्थीनीचे मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
सुलभ अर्ज प्रक्रिया आणि हे लागतात आवश्यक कागदपत्रे.
राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेत अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे लागतात. यासाठी प्रक्रिया खूप सोपी आणि सहज ठेवण्यात आलेली आहे.
- विद्यार्थिनी यासाठी ऑफलाइन पद्धतीने मोफत सायकल मिळविण्यासाठी आपला अर्ज करू शकतात.
- आवश्यक कागदपत्र
- विद्यार्थिनीचे आधार कार्ड.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- शाळेचे ओळखपत्र.
- वडिलांचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र.
- पालकाचे संमती पत्र.
- विद्यार्थिनींचे बँक खात्याचे तपशील समाविष्ट करण्यात आलेली आहे.
- या सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार विद्यार्थिनी आपल्या शाळा व्यवस्थापन समिती किंवा पंचायत कार्यालयात सुद्धा हे सादर करू शकतात.
राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजनेचे सामाजिक महत्त्व संबंधात महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.या योजनेचा प्रभाव फक्त शैक्षणिक नव्हे तर सामाजिक सुद्धा आहे.यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
शासकीय योजनांमध्ये लिंग समानता आणणे,आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
Rajmata Jijau Free Cycle Scheme योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख.
या योजनेची जिल्हास्तरावर अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी यंत्रणा सरकारने निवडली आहे.सर्व जिल्ह्यात याची अंमलबजावणी शिक्षण विभागामार्फत केली जाते.
जिल्हा आणि तालुका पातळीवर या योजनेची देखरेख करण्यात येते. यातील लाभार्थी विद्यार्थिनींची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाते,आणि मोफत सायकल वाटप प्रक्रिया नियमित प्रणालीने होते.
मोफत सायकल योजनेचे फायदे आणि आव्हाने.
महाराष्ट्र सरकारची राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजनेत काही आव्हाने आणि देखभाल संदर्भात समस्या सुद्धा आहेत.या योजनेचा विद्यार्थी विद्यार्थिनींना लाभ दिल्यानंतर सायकलची देखभाल आणि दुरुस्ती वर लाभार्थ्यांना स्वतः खर्च करावा लागतो.तसेच दुर्गम भागात सायकली वापरण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने ही योजना समोर एक आव्हान आहे.मात्र सरकार यावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
एकूणच महाराष्ट्र राज्य सायकल वाटप योजना ही राज्यात मुलींच्या शैक्षणिक सुधारणेत एक महत्त्वाची पायरी ठरणार असून, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे,कारण मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची मुख्य अडचण म्हणजे भौगोलिक अडचण दूर करून,शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचण्याचे काम या योजनेचे मार्फत होत आहे.