Railway Book Now Pay Later Scheme : भारतीय रेल्वे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाची जीवनदायीनी सेवा मानली जाते.अनेकदा अचानक छोटा किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा रेल्वेची मदत घ्यावी लागते.
मात्र अचानक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी किंवा रेल्वेने कुठेही जाण्यासाठी गरज आली आणि जवळ पैसा नसला किंवा बँक खात्यात पैसे नसले तर तिकिटासाठी आर्थिक अडचण येत असते.
मात्र अश्या प्रवाशांच्या आर्थिक अडचणीवर इंडियन रेल्वेने आता मात करून आता फ्री प्रवासासाठी आकर्षक आणि सुविधाजनक स्कीम सुरू केली आहे. ती म्हणजे बुक नाऊ अँड पे लेटर योजना Book Now Pay Later Scheme.
या योजनेचा लाभ घेताना प्रवाशांना एकही अचानक रेल प्रवासाची गरज पडल्यास आणि जवळ पैसे नसल्यास तिकीट बुक करताना एक रुपयाही न देता रेल्वेतून प्रवास करता येणार आहेत. ते कसे तर भारतीय रेल्वेची योजना काय ती जाणून घ्या……
भारतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेच्या ट्रेनला अधिक पसंती दिली जाते याची मुख्य कारणे आहेत रेल्वेची स्वस्त तिकीट आणि आरामदायक प्रवास. यासाठी सीट आरक्षण असला तर फार सुविधा होते जर रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे पैसे नसेल तर रेल्वे या संदर्भात आनंदाची वार्ता दिलेली आहे.
रेल्वे प्रवास सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी नवीन स्कीम आणि सुविधा देत असते.याच पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वे कडून “आधी तिकीट बुक करा नंतर पैसे द्या” ही नवीन योजना सुरू केलेली आहे Book Now Pay Later Scheme.
याअंतर्गत आता कोणताही रेल्वे प्रवास करण्यासाठी पैसे नसल्यास ॲडव्हान्स मध्ये पैसे न भरता कोणीही रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहे.रेल्वे प्रवासानंतर हे पैसे प्रवासी या योजनेअंतर्गत रेल्वेला अदा करू शकणार आहे.
अर्थातच भारतीय रेल्वेची ही योजना ऑनलाइन वस्तू किंवा इतर सामग्री आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करताना वस्तू हातात मिळाल्यानंतर पेमेंट अदा करावे लागते,तशी ही योजना आहे. Order On Delivery.
पैसे नसले तरीही रेल्वे तिकीट बुकिंग वेळी “बुक नाऊ पे लेटर योजना” कामी पडणार.
एखादा वेळी अचानक लांब पडण्याचा रेल्वे प्रवास करण्याची वेळ आली किंवा तिकीट बुक करताना जवळ पैसे नसले किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बँक खात्यात पैसे नसले तरी रेल्वे तिकीट बुकिंग च्या वेळी ही “Railway Book Now Pay Later Scheme” कामी पडणार आहे यात रेल्वे तिकीट बुक करताना तिकिटाचे शुल्क नगदी स्वरूपात अदा न करता रेल्वे प्रवासासाठी आवश्यक तिकीट मिळतो.यावेळी तिकीटसाठी नगद किंवा ऑनलाईन पेमेंट साठी पैसे नसल्यास तिकीट शुल्क अदा करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळतो.
रेल्वे Book Now Pay Leter सुविधा वापर करून कोणीही निर्धारित मुद्दत मध्ये पेमेंट केले तर या उधारीसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार नाही, मात्र या योजनेतून तिकीट काढून रेल्वे प्रवास केल्यानंतर निर्धारित 14 दिवसांच्या आत पैसे Pay केले नाही तर एकूण रकमेवर रेल्वे विभागाला 3.5% सेवा शुल्क Service Charge भरावा लागेल.विशेष म्हणजे भारतीय रेल्वे विभागाने ही योजना रेल्वे प्रवासासाठी फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंग वर उपलब्ध केलेली आहे.
असे घेऊ शकतात पे लेटर योजनेचे लाभ.
रेल्वेची बुक नाव पे लेटर या योजनेसाठी आयआरसीटीसी ने आपल्या ॲप मधून आणि भारतीय रेल्वेच्या वेबसाईटमध्ये ही सुविधा ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग साठी उपलब्ध करून दिली आहे.
- यासाठी सर्वप्रथम आईआरसीटीसीच्या https://www.irctc.co.in/nget/train-search
या वेबसाईटवरून आपल्या खात्यात लॉगिन करावे लागेल. - रेल टिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाची माहिती आणि यात दिलेला केपेचा CAPATCHE भरून सबमिट करावे लागेल.
- तिकिटासाठी नोंदणी केल्यानंतर, क्रेडिट/डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा भीम ॲप द्वारे तिकीट बुकिंग साठी पेमेंट पर्याय मिळेल.
- जर रेल्वे बुक नाऊ पे लेटर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर यासाठी येथे Book Now Pay Later हा पर्याय निवडून नोंदणी करावी लागेल.
- जर आधी तिकीट नंतर तिकीट पेमेंट करायची असेल तर प्रथम www.epaylater.in या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकतात.
- हा पर्याय निवडल्यानंतर, कोणत्याही आगाऊ शुल्काशिवाय रेल्वे तिकीट मिळेल.No Advance Pay.
अचानक रेल्वे प्रवासाचा प्लॅन करण्यासाठी किंवा रेल्वे प्रवास करायचा आहे आणि आर्थिक अडचण असेल तर 14 दिवसांची अवधी घेऊन रेल्वे तिकीट बुक करून या योजनेतून तिकीट मिळविता येतो त्यामुळे ही योजना खूप फायदेशीर आहे.अनेकदा तिकीट बुकिंग करायचे असते पण त्यावेळी बँक खात्यात पैसे नसतात.
मात्र रेल्वेच्या या योजना सुविधामुळे आता कोणत्याही आर्थिक कारणाशिवाय रेल्वे तिकीट बुक करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.यात एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे,ती म्हणजे तिकीट बुक केल्यानंतर आणि तिकीट प्राप्त करून प्रवास केल्यानंतर रेल्वे प्रशासन शुल्क अदा करण्याचे जे निर्धारित 14 दिवसांचा अवधी देते, त्या अवधीत तिकीट शुल्क पैसे भरणे आवश्यक आहे,अन्यथा तिकीटापेक्षा जास्त अर्थातच एकूण तिकीट रकमेवर सर्विस चार्ज म्हणून 3.5 टक्के दंड भरावा लागेल.