पुर्णा नदीपात्रातून अवैध रेती /वाळू उपसा रात्रीच्या वेळी चालतो हा खेळ‌.

पुर्णा नदीपात्रातून अवैध रेती /वाळू उपसा रात्रीच्या वेळी चालतो हा खेळ‌.

प्रतिनिधी/ सेनगाव: सेनगाव तालुक्यात रेती माफियांनी आपला दबदबा कायम ठेवून पुर्णा नदीपात्रातील प्रतिदिन शंभर ब्रास रेतीची यंत्राद्वारे भर दिवसा साठा करून ठेवला जातो साठवलेल्या रेतीचा रात्रीच्या अवैध मार्गाने वाहतूक असते महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अभयामुळे करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

हा प्रकार रात्रीचा चाल त असतो असा महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवून अव्याच्या सव्या भावाने रेतीची राजरोसपणे विक्री करत असल्याने ते माफिया मालामाल होत आहेत प्रशासनाकडून अवैध धंद्यांना आळा घातल्या असल्याचा कांगावा केला जातो मात्र सेनगाव तालुक्यातील भर दिवसा यंत्राच्या सहाय्याने नदीपात्राच्या कडेला साठा करून ठेवला जात आहे आणि रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच्या व टिप्पर च्या माध्यमातून प्रतिदिन शंभर ब्रास मार्गाने माफियाकडून पहावयास मिळत आहे.

या अगोदर रेती विक्रेत्याकडून महसूल प्रशासनात व पोलीस प्रशासनात अर्थपूर्णहित संबंध असल्याचे आरोप दिसून येतात सेनगाव परिसरात रात्रीच होणारे पेट्रोलिंग ही केवळ नावालाच आहे पुर्णा नदीपात्रातून यांत्रिक पद्धतीने बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करून राजरोसपणे अव्याच्या सव्या किमतीमध्ये विक्री केली जात आहे परंतु महसूल प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे.

ब्रह्मवाडी पुर्णानदीपात्रातून होणारी अवैध वाळू उपसा ही केवळ आणि केवळ रात्रीच्या वेळेस यांत्रिक पद्धतीने साठा केलेली रेती ही स्टॉक वर टाकून ती पुन्हा स्टॉक मध्ये विक्री करीत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी पुर्णानदीपात्रातून अवैधरीत्या रात्रंदिवस येथे उपसा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना यांची कल्पना होती परंतु महसूल प्रशासनाला याची कल्पना का होत नसावी हा संशोधनाचा विषय आहे तालुक्यातील महसूल प्रशासनाने भरारी पथक स्थापन केली.

आहेत ते मात्र स्थानिक राजकीय पुढारी व रेती माफिया यांच्यावर कारवाई करण्यास का धस्तावत नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे तालुक्यातील पथक उरले केवळ नावापुरतेच असा आरोप नागरिकांतून होताना पाहावयास मिळत आहे.

अवधरीती माफियाची पाठीराखे कोण रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफी यांना राजकीय पुढार्‍याकडून पाठराखण केली जाते की जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय मिळते याची जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करावी राजरोसपणे रेती उपसा करणे रेती माफी यांचे राजकीय पुढारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे हितसंबंध असल्यास विना ही गोष्ट शक्य नसल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे अशा अवैध रेतीमाफी आणि विरुद्ध कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 4 =