No Toll Tax : आता भारतात कुठे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना मार्गावर येणाऱ्या टोल प्लाजांवर टोल अदा करण्याची झंझट मिटणार आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना आपल्या कार मधून आणि इतर कार चालक मालकांनाही राष्ट्रीय महामार्गांवर टोल अदा न करता बिनदिक्कत प्रवास करणे सोपे होईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि संबंधित टोल प्लाजा संबंधात ही बातमी समोर आल्यानंतर देशभरातील वाहनधारकांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबे आणि कार मालक आणि चालकांना सरकारकडून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोलमुक्तीची लवकरच भेट मिळणार आहे.
No Toll Tax : लवकरच टोल फ्री योजनेची भेट मिळणार.
प्रत्येकाला आपल्या कामासाठी किंवा व्यवसाय नोकरीसाठी देशातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो अशा सर्वांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मध्यमवर्गीय कुटुंब आणि कारमालकांना सरकारकडून लवकरच टोल फ्री योजनेची भेट मिळणार आहे.
सरकारकडून नुकतेच राष्ट्रीय महामार्गांवर सुरू असलेल्या टोल नाक्यांसाठी आणि चार चाकी कार धारकांसाठी वार्षिक टोल पास योजना अमलात आणण्याचा विचार करण्यात येत आहे.
- वर्षभरात फक्त एकदा पैसे अदा करून पंधरा वर्ष टोल पासून मुक्ती मिळणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करण्यासाठी या पाससाठी फक्त तीन हजार रुपये वार्षिक टोल साठी द्यावे लागतील,आणि देशभरात विना अडथळा राष्ट्रीय महामार्गावर टोल मुक्त प्रवास करता येणार आहे.
- उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून या योजनेत टोल टॅक्स साठी लाईफ टाईम पासच्या ऑप्शन सुद्धा देण्यात येणार आहे.यात फक्त एकाच वेळी 30 हजार रुपये सरकारला अदा केले की,पुढे पंधरा वर्षे टोल न भरता राष्ट्रीय महामार्गांवर बिनधासपणे टोल पलाझावर टोल न देता टोलमुक्त प्रवास करता येईल.
विविध प्रकारच्या टोल पास चा पर्याय मिळणार ?
या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या योजनेवर काम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबे आणि कार चालकांना टोल नाक्यांवर लागणारा जास्त आर्थिक भार आणि वेळोवेळी यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता, विविध प्रकारच्या टोल पास चा पर्याय देवून एकाच वेळी निर्धारित शुल्क अदा करून,नेहमी येणाऱ्या टोलसंबंधी अडचणीतून मुक्त करण्याची ही योजना आहे.मंत्रालयाने या प्रस्तावावर गंभीरतेने विचार सुरू केला आहे.
वाहनधारकांच्या फास्ट टॅग मध्येच पास जोडला जाईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय या योजनेनुसार खाजगी चार चाकी गाड्यांसाठी आता प्रत्येक किलोमीटर वर टोल दर बदलण्याचा विचार करीत आहे.
यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.यात टोल साठी नवीन पास खरेदी करण्याची गरज राहणार नसून हा टोल पास वाहनधारकांच्या फास्ट टॅग मध्येच जोडला जाईल.
काय आहे वार्षिक पासचा पर्याय.
- उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी सध्या मासिक पास सुविधा देण्यात येते.
- हा पास दररोज महामार्गावर असलेल्या एकाच टोल नाक्यावरून जाणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येतो.
- यासाठी आपला पत्ता आणि व्यक्तिगत आणि वाहनाची माहिती द्यावी लागते.
- दर महिन्यात यासाठी 340 रुपये अदा करावे लागते.अर्थातच वर्षभरात हा टोल शुल्क 4 हजार 80 रुपयांचा राहते.
- मात्र आता वार्षिक पास योजना सुरू झाल्यास,देशातील नॅशनल हायवे नेटवर्क वर एका वर्षात प्रवासासाठी फक्त 3 हजार रुपयांची पास मिळणार आहे.
- ही नवी ऑफर विविध टोल प्लाजा वर प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोल साठी सध्या लागणाऱ्या खर्चापेक्षा खूप कमी असेल.
- वाहनधारकांसाठी ही पर्यायी सुविधा राहणार असून लोकांच्या ती पसंतीस उतरू शकते, अशी शक्यता आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी महत्त्वाचे भाष्य केलेले आहे. आपले मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या कारमालकांना पास देण्याच्या नवीन योजनेवर काम करीत असल्याचे ते म्हणाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर कारचालकांना लागणार टोल टॅक्स, टोल प्लाजांवर या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर उपाय म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय या योजनेवर विचार करीत आहे,असे सूत्र म्हणत आहे.
टोल वसुलीवर होते हिंसाचार.
उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय महामार्गांवर आणि इतर मार्गांवर असलेल्या टोल प्लाजा आणि टोल नाक्यांबाबत वेळोवेळी विविध ठिकाणी टोल कर संबंधी नाराजी दिसते. यातून अनेक आंदोलने होतात.
महाराष्ट्रात 50 ते 60 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावरील टोलनाके आणि तेथे टोल वसुलीमुळे अनेकदा अनुचित घटना,आणि हिंसाचारही घडत असल्याने सरकारला विरोधी पक्षाच्या आणि सामाजिक संघटनांच्या निशान्यांवर यावे लागते.
यामुळे टोल प्लाझावर टोल अदा करण्यासाठी कमी पैशात पास सुविधा उपलब्ध करण्याच्या या योजनेचा सर्वांना फायदा होऊन,सरकारलाही दिलासा मिळणार आहे.
सरकारला असा मिळाला फायदा.
देशात सरकारकडून राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीसाठी टोल प्लाजा ठेकेदारांना हस्तांतरण करण्यात येते. नुकतेच समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार वर्ष 2023 -24 मध्ये सरकारकडे टोल टॅक्स मधून जमा एकूण टॅक्स निधी 55 हजार कोटी मध्ये,खाजगी कारमुळे सरकारला 8 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
महत्त्वाचे म्हणजे टोल नाका व्यवहारांदरम्यान आणि सरकारच्या वसुलीचे आकडेवारीनुसार खाजगी कारचे टोल टॅक्स योगदान व्यवहार 53% इतके आहे. टोल वसुलीत खाजगी कारचा वाटा फक्त 21% होता.
सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दरम्यान राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाजांवर तब्बल 60 टक्के दळणवळण ही खाजगी कार आणि इतर वाहनांची असते.यादरम्यान व्यावसायिक ट्रान्सपोर्ट वाहनांची ट्रॅफिक टोल प्लाजा वरून नेहमी सारखीच असते.
वार्षिक पास योजनेमुळे सरकारला उत्पन्नात काहीच नुकसान होणार नसल्याचा दावा.
या वार्षिक पास योजनेमुळे सरकारला उत्पन्नात काहीच नुकसान होणार नसल्याचा दावा केला जात आहे.मात्र या दरम्यान नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात टोल टॅक्स संबंधात आपला महसूल गमववा लागू शकतो, ही शक्यता आहे.
मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची ही योजना सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबे आणि कारचालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.याशिवाय वेळ,आर्थिक बचत आणि वारंवार टोल भरण्याची समस्या देखील दूर होईल.
मात्र भविष्यात ही योजना केव्हा सुरू होईल, आणि ती किती काळ टिकेल, चार चाकी कारधारकांना याचा किती फायदा मिळेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.