New GR For Teachers : महाराष्ट्र सरकारने आता शिक्षक पद भरतीसाठी नवा जीआर काढलेला आहे. त्यामुळे आता राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे.
राज्यात ज्या शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी असेल, अशा शाळांमध्ये आता डीएड बीएड पात्रता धारक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा सरकारने जो निर्णय घेतला होता, त्याला रद्द करण्यात आला आहे.
राज्यात विविध शाळांमध्ये शिक्षक भरती संदर्भात महाराष्ट्र सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता, त्यात आता मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त शिक्षकांचा कालावधी हा संबंधित सरकारी शाळांमध्ये नियमित शिक्षक नियुक्ती पर्यंत राहणार आहे.
शिक्षक भरती संदर्भात महाराष्ट्र सरकारने आता नवा आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.ज्या शाळांमध्ये 10 विद्यार्थी किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असेल,अशा शाळांमध्ये आता डीएड आणि वेळ धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर जी नियुक्ती करण्यात येणार होती,त्या संदर्भात शासन निर्णय आता रद्द झालेला आहे.
उल्लेखनीय म्हणजे राज्यात विविध शाळांसाठी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे.त्यामुळे आता नियमित शिक्षकच आता अशा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्येही शिकविणार आहे.
यापूर्वी काय घेतला होता सरकारने निर्णय.
महाराष्ट्रात जिथे जिथे सरकारी शाळा आहे, आणि ज्या ठिकाणी दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असेल, अशा शाळांमध्ये बेरोजगार असलेले पात्रता धारक उमेदवार कंत्राटी तत्वावर नियुक्त करावे अशी मान्यता सरकारने या जीआर नुसार दिली होती.
हा शासन निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये जारी करण्यात आला होता.कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षक नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने अशा शाळांसाठी शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था व्हावी,यासाठी सरकारने कंत्राटी शिक्षक पद भरतीतून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अशा पात्रता धारक शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासंबंधात वरील निर्णय घेतला होता.
New GR For Teachers : काय म्हणतो आता सरकारचा नवा जीआर.
सध्या महाराष्ट्रात कंत्राटी शिक्षक पद भरतीसाठी वर्ष 2022 मध्ये शिक्षकांसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी CET Test मधील मिळालेल्या गुणांच्या आधारावर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा पूर्ण होण्याच्या दिशेने आहे.यामुळे आता सरकारी शाळांमध्ये पात्रता धारक शिक्षक कंत्राटी नव्हे तर नियमित तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती होणार आहेत.
हा कारण समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने वर्ष 2024 मध्ये कॉन्टॅक्ट बेसिसवर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ,हा सरकारी शाळांमध्ये नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंतच असेल, असा हा नवा शासन निर्णय नुकतेच जारी करण्यात आला आहे.