नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावच्या आखाड्यावर जनावराची चोरी.

नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावच्या आखाड्यावर जनावराची चोरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावातील आखाडय़ावर बांधून ठेवलेल्या तीन गायी ,एक गोरा व दोन बैल अशा एकूण दिड लाख किमतीचे जनावरे चोरीला गेल्याची घटना दि. ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चो-यांचे सत्र सुरूच असुन चोरटे पोलीसाच्या नाकावर टिच्चून चोरी करत आहेत पण तपास मात्र जैसे थे च दिसुन येत आहे.

कोलंबी येथील अंनता दत्तात्रय बैस यांच्या शेतातील आखाडय़ावर ७५ हजार रूपये किमतीचे दोन बैल बाधुंण होते .अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तर त्याच रात्री केदारवडगाव शिवारात व्यंकटी केरबा जाधव यांच्या आखाडय़ावरून ३० हजार रूपये किमतीच्या २ गायी चोरट्यांनी चोरून नेले तर रातोळी येथील शेतकरी विलास बाबाराव माऊलगे यांच्या आखाडय़ावरून लहाण मोठे २० जनावरे बांधून होते त्यापैकी १५ हजार किमतीची लाल रंगाची एक गाय , ३० हजार किमतीचा एक गोरा असा ४५ हजार तर तीन ठिकाणाहून जवळपास पावणे दिड लाखाचे पशुधन चोरीला गेले.

एकाच रात्री तीन गावात चोरीच्या घटना घडल्याने शेतक-यात भितीचे वातावरण पसरले आहे.नुकतेच नायगाव शहरातून एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडलेली असताना पुन्हा नायगाव ठाण्याच्या हद्दीत चो-यांचे सत्र सुरूच झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या ठाण्याला एका कर्तव्य दक्ष आधिका-यांची नेमणूक करावी व मागील चो-यांचा तपास लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − thirteen =