Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : वयोवृद्धांना मिळणार आधार – शासनाची वयोश्री योजना,ज्येष्ठांना नव्या योजनेतून, मिळणार 3000 रुपये
राज्यातील वयोवृद्ध नागरिक व वृद्धांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने नुकतेच वृद्धांसाठी “Mukhyamantri Vayoshri Yojana” ही योजना लॉन्च केली आहे.यासाठी महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.विशेष म्हणजे ज्या जेष्ठ नागरिकांना आपल्या गरजेची उपकरणं खरेदीसाठी आर्थिक उपाय नाहीत. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
मोठा आधार मिळणार.
राज्य शासनाने समाजकल्याण विभागाच्या मार्फत या वयोश्री योजनेला चालविण्याचे निर्देश दिले आहे.या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं योजनेसाठी आर्थिक स्त्रोत म्हणून यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वृद्ध नागरिकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेमुळे ज्या वृद्ध नागरिकांना ऐकण्यात, दिसण्यात आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक गरजेची उपकरणं देण्यात येतात.
5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री यांनी केली होती घोषणा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या वयोश्री योजनेची घोषणा केली होती.राज्यातील वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असेल.यातून ३ हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच गरजेची उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येनार आहे.
कोणती कागदपत्रे आणि काय पात्रता राहणार.
वयोश्री योजनेसाठी शासनाने वृद्धांसाठी काही निकष ठेवले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वृद्ध नागरिकांना कोणती कागदपत्रे लागणार आणि यासाठी काय पात्रता राहील यावर सूचना केलेली आहे. या सर्व बाबींची माहिती समाज कल्याण विभाग तसेच सोशल प्लॅटफॉर्मवरून शासन सार्वजनिक करणार आहे.
वृद्धांचा दैनंदिन जीवन सामान्य करण्याचे प्रयत्न.
राज्यातील 65 वर्षे वय व यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगणे सोपे व्हावे,त्यांना वयोमानानुसार शरीरात येणारा अपंगत्व,अशक्तपणा या बाबींवर उपाय मिळावे यासाठी आवश्यक सहायक साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र,योगोपचार, निसर्गोपचार केंद्र इत्यादी द्वारे वृद्ध जणांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ही “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
कोणती उपकरणं मिळणार.
मुख्यमंत्री वयोश्री या योजनेतून वृद्धांना 3000 रुपये रोख आर्थिक मदत मिळेल.यातून काही गरजेचे उपकरणे वृद्ध नागरिकांना देण्यात येईल.
यात चष्मा,ट्रायपॉड,कमरेचा पट्टा,फोल्डिंग वॉकर,ग्रीवा कॉलर,स्टिक व्हीलचेअर,कमोड खुर्ची,गुडघा ब्रेस,श्रवणयंत्र आदी उपकरणे मिळणार आहेत
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र राहणार.
योजनेसाठी शासनाने काही अटी व शर्ती तसेच निकष ठरविले आहे यात वृद्ध नागरिक हा महाराष्ट्राचा नागरिक असावा, अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे,अर्जदार वृद्ध अर्जदाराला शारीरिक वा मानसिक त्रास होत असेल अशांना योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व यशस्वी योजनेतून राज्यातील ३० टक्के वृद्ध महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
कोणती कागदपत्रे लागणार.
या योजनेसाठी व याचा लाभ घेण्यासाठी वृद्ध नागरिकांना कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती शासनाने दिली आहे यासाठी आधार कार्ड,ओळखपत्र,उत्पन्न प्रमाण पत्र,
जात प्रमाणपत्र,स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र, वृद्धांना होणाऱ्या शारीरिक त्रासाबाबत मेडिकल प्रमाणपत्र, बँक,खाते पासबुकमोबाईल नंबर,पासपोर्ट साईज फोटो
इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावे लागेल.