Mahavitaran Abhay Yojana : महावितरण कंपनीने आपल्या वीज ग्राहकांना त्यांच्याकडे थकबाकी असलेली रक्कम सवलत देऊन अदा करण्याची आणि विजबिल थकबाकीतून मुक्त होण्याची संधी दिलेली आहे.महावितरण ने यासाठी अभय योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली.
आता जास्तीत जास्त वीज ग्राहकांना याचा लाभ मिळावा आणि वीज ग्राहक आपल्या वीज बिलापासून थकबाकी मुक्त व्हावे यासाठी ही अभय योजना महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र आता वीजग्राहकांना या योजनेचा फायदा फक्त 31 जानेवारी 2025 पर्यंतच मिळणार आहे.
Mahavitaran Abhay Yojana थकबाकीतून मुक्त होण्याची संधी
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वीजबिल थकीत असताना वीज मीटर ग्राहकांची जर जागेची मालकी बदलून नवीन जागा मालक किंवा ताबेदार असेल त्यांना तेथील विज बिलाची थकित रक्कम भरावी लागेल,असा निर्णय महावितरणच्या याचिकेच्या सुनावणी नंतर दिला होता.
त्यामुळे आता अशा जागांवर वीज वापरायची गरज असो किंवा नसो,मात्र त्यांच्यावर असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या या अभय योजनेअंतर्गत घरगुती,औद्योगिक,वाणिज्य आणि इतर नॉन एग्रीकल्चर वीज ग्राहकांना मिळेल.
यासाठी अभय योजना येत्या 31 मार्च पर्यंत सुरू असेल.एकूण वीज बिल थकबाकीतून विलंब आकार आणि मूळ रकमेवर लागलेला व्याज सोडून मूळ रक्कम भरून थकबाकी पासून या योजनेतून वीजग्राहक मुक्त होऊ शकतात{.Free From Electricity Pending Bills}
राज्यात चंद्रपूर वीज परिमंडळात महावितरणच्या या अभय योजनेत सहभागी असलेल्या नवीन जागा माल, ताबेदार आणि शासकीय तसेच कृषी वीज योजनेतील ग्राहक वगळून इतर सर्व वीज ग्राहकांना विजेची गरज नसतानाही थकबाकी रक्कम भरून अभय योजनेतीन आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे.
अशा वीज ग्राहकांनी आपली थकीत बिले भरून योजनेतून सुविधा घेत थकबाकीतून मुक्ती मिळविलेली आहे.{Bill Free Scheme By Mahavitran.{ येत्या 31 मार्च पर्यंत महावितरण कडून कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून सर्व प्रकारचे वीज ग्राहकांना महावितरण अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.
- चंद्रपूर वीज विभागात आतापर्यंत अभय योजनेत एकूण 1925 ग्राहकांनी सहभाग नोंदवून यापैकी 1 हजार 630 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला.
यातून महावितरण कडे एक कोटी 24 लाख 41 हजार रुपयांची वीज बिल तक बाकीची रक्कम भरण्यात आलेली आहे. - गडचिरोली विजमंडळात या योजनेत 3723 ग्राहक सामील झाले,यापैकी 3540 ग्राहकांनी अभय योजनेतून लाभ घेतला आहे.
या थकबाकीदार ग्राहकांकडून 1 कोटी 44 लाख 90 हजार रुपयांची थकबाकी रक्कम भरण्यात आलेली आहे.
थकबाकीदारांकडून फक्त मूळ थकबाकीची रक्कम वसुली.
विशेष म्हणजे महावितरणच्या या अभय योजनेत विज बिल थकबाकीदारांकडून फक्त मूळ थकबाकीची रक्कम प्राप्त केली जात आहे.मूळ थकबाकीची पूर्ण रक्कम भरल्यास महावितरण कडून थकबाकी वर कोणताही व्याज आकारण्यात येत नाही.त्यामुळे या योजनेत 100 टक्के व्याज आणि विलंब शुल्क रक्कम माफ करण्यात येत आहे.
महावितरण कडून अभय योजनेअंतर्गत वीज ग्राहकांची मूळ थकबाकी एक रकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना पुन्हा एकूण रकमेवर 10 टक्के आणि उच्च दाबाचा वीजपुरवठा घेणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या एकूण रकमेवर 5 टक्के सूट देण्यात येत आहे.
सोबतच मूळ थकबाकी बिलाची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त करून त्याला एकूण सहा आपल्यांमध्ये महावितरण कडे भरण्याची सुविधा या योजनेतून देण्यात येत आहे.
(Electricity Bill Waiver Scheme In Maharashtra) त्यामुळे राज्यभरात थकबाकीदार ग्राहकांनी महावितरणच्या या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
फ्रेंचाईजी मधील ग्राहकांनाही अभय योजनेत केले सामील.
महावितरणच्या या अभय योजनेमध्ये वीज सुविधा घेणाऱ्या विविध फ्रेंचाईजी मधील वीज ग्राहकांनाही अभय योजनेत सामील करून त्यांना याचा लाभ देण्यात येत आहे.
यासाठी महावितरण कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि महावितरणचे मोबाईल ॲप्लिकेशन वरूनही ऑनलाइन अर्ज आणि थकबाकीची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अभय योजनेची माहितीसाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या जवळच्या वीज कार्यालयात संपर्क साधण्याची माहिती देण्यात आलेली आहे.(Mahavitran Abhay Yojana Benefits.)
महावितरणच्या अभय योजनेची वैशिष्ट्ये.
महावितरण करून महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली महावितरण अभय योजनेची अनेक वैशिष्ट्ये कोणती आहेत, ते आपण जाणून घेऊया….
- वीज बिलाची मूळ थकबाकीची 30% रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याज मुक्त 6 हप्त्यात भरण्याची सुविधा.
- घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक आणि नॉन एग्रीकल्चरल
जागांवर वापरण्यात येणाऱ्या वीजमीटर वरून वीज बिलांच्या थकबाकी मुक्तीची संधी.
थकबाकीमुळे वीज कनेक्शन कपात झालेल्या ग्राहकांकडून विज बिल भरल्यानंतर त्यांच्या मागणीप्रमाणे तात्काळ नव्याने वीज कनेक्शन उपलब्ध करण्यात येत आहे.
मूळ थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत बिलाची एकाचवेळी पूर्ण रक्कम भरल्यास लघुदाब वीज ग्राहकांना एकूण बिल रकमेत आणखीन 10 टक्के सूट उच्च दाब ग्राहकांना एकूण रकमेत पुन्हा 5 टक्के सूट देण्यात येत आहे.
31 मार्च 2024 पर्यंत वीज बिलाची रक्कम थकबाकी असल्याने कायमस्वरूपी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन खंडित झालेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांनाही या योजनेत सामील होऊन,पुन्हा आपला वीज कनेक्शन जोडण्याची संधी मिळणार.
महावितरण कंपनीची अभय योजना वीज ग्राहकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.