Maharashtra Cabinet : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात युथ ब्रिगेडचा वर्चस्व राहणार,मंत्री मंडळात युथचा वर्चस्व,जुन्या,ज्येष्ठांना डच्चू ? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती ने घवघवीत यश संपादन केला असून आता राज्यात सत्ता स्थापनेची हालचाली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात नवा मंत्रिमंडळ लवकर स्थापन होणार असून या नवीन मंत्रिमंडळात यंदा नवीन आणि युवा चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नवी मंत्रिमंडळात युद्ध ब्रिगेडचा वर्चस्व वाढणार असून जुन्या आणि जेष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात कमी जागा मिळणार आहे.
विशेष म्हणजे राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच नवीन मंत्रिमंडळावर अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीला मोठा जनादेश मिळाल्यानंतर मंत्रिमंडळासाठी नवीन असा ट्रेण्ड दिसून येत आहे. राज्यात महायुतीची दुसरी पाळी सुरू होताना महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात नव्या चेहऱ्यांना मोका देण्यासंदर्भात काय रणनीती आखली आहे हे पाहूया.
जुन्यांना वगळून युवकांना संधी मिळणार का ?
एरवी मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात राजकारणात तरबेज आणि अनुभवी नेत्यांना जागा असते. आतापर्यंत महाराष्ट्रातील राजकारणात हाच ट्रेंड राहिला आहे.पण यात आता बदल होण्याचे संकेत दिसत आहे. राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात यंदा कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून ज्येष्ठ मंत्री आणि अनुभवी नेत्यांच्या जागी महायुतीच्या पक्षांकडून पन्नास वर्षांच्या आत असलेल्या सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या नव्या कॅबिनेट आणि मंत्रिमंडळात युथ ब्रिगेड चा वर्चस्व राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र यंदा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील कोणत्या आणि किती युवा आमदारांची मंत्रिमंडळात लॉटरी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागले आहे.
भाजपच्या या युवा आमदारांकडे लक्ष महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात भाजप पक्षातील सर्वाधिक युवा आमदारांना यंदा मोका मिळणार असल्याची चर्चा आहे.
या युवा आमदारांमध्ये :
- गोपिचंद पडळकर
- नितेश राणे
- राहुल कुल
यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची ही चर्चा आहे.तर राष्ट्रवादी (AP) पक्षातील
- संजय बनसोडे
- संग्राम जगताप
- आदिती तटकरे
आणि शिवसेना शिंदे पक्षातील युवा आमदार
- आमशा पाडवी
- योगेश कदम
- अमोल खताळ
यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारचा संभाव्य फॉर्म्युला हा असेल?
यंदाच्या विधानसभा निवडणुकी त महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकले आहे.विधानसभेच्या निवडणूक निकालात भाजपला सर्वाधिक 132, शिवसेना शिंदे गटाने 57 तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर महायुतीमध्ये काही दिवस नवीन मुख्यमंत्री कोण असेल यावर संभ्रम कायम होता मात्र परवा एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयावर मान्य असेल हे असे वक्तव्य केले, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणाऱ्या मुद्द्याला दुजोरा मिळाला आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असल्याचे मानले जात आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात सरकार संचालन करताना महायुतीने तिन्ही पक्षांना समान संधी हा फार्मूला फिक्स करून भाजपच्या दोन्ही सहकारी पक्षांना सरकारात योग्य प्रतिनिधित्व आणि त्या पक्षातील युवा आमदारांना पावरफुल कॅबिनेट देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगली आहे. नव्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना मंत्री म्हणून मोका देतानाच तिन्ही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आणि आमदारांचा पुनर्वसन कसा होईल याचा फार्मूलाही निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली,त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात किती अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळतो आणि कुणाला डच्चू मिळतो सोबतच त्यांच्या जागी कोणत्या युवा चेहऱ्यांना मंत्री बनविण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.