Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठीमहत्त्वाची माहिती समोर आली, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता?
राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडके बहीण योजने मध्ये नोव्हेंबर पर्यंत शासनाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत साडेसात हजार रुपये टाकली आहे. यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. राज्यात पुन्हा नव्याने महायुती सरकार सत्तेत येण्यामागे लाडकी बहीण योजना हा मैलाचा दगड मानला जात आहे. त्यामुळे पुढे सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी ही रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.त्यामुळे आता राज्यातील सरकारच्या लाडक्या बहिणी डिसेंबर 2024 या महिन्यात वाढीव रकमेच्या म्हणजेच 2100 रुपये हप्त्याची वाट पाहत आहेत.मात्र राज्यात महायुती सरकार स्थापन होताच आता लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. पुढच्या हप्ता देण्यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार असून पात्र लाभार्थी महिलांना पुढील हप्ते देण्यात येणार आहे. मात्र लाडकी बहिण योजनेत नव्याने काही बदल आणि निकष बदलले आहे का, पुढील हप्ता हा 2100 रुपयांचा असेल का? यावर नव्या सरकारने अद्याप सार्वजनिक माहिती दिली नाही.मात्र लवकरच पात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री भाऊ बदलले,आता नव्या मंत्रिमंडळनंतर मिळणार का पुढील हप्ता?.
राज्यात लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने पुन्हा आपली सत्ता स्थापित केली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री भाऊ एकनाथ शिंदे यांच्या जागी आता नवीन मुख्यमंत्री भाऊ देवेंद्र फडणवीस आले आहेत.महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सध्या मंत्रिमंडळाचा पुनर्गठण होणे बाकी आहे, लाडकी बहीण योजनेत आलेले अर्जांची छाननी होईल किंवा नाही यावर नव्या सरकारकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. सोबतच सध्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.त्यामुळे एकूणच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यातच मिळणार का? किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये निकषात बदल, नव्याने अर्जांची तक्रारीच्या आधारे छाननी होईल का? यावर आता सर्वांच्या नजरा लागलेले आहेत.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे महत्त्वाची भाष्य.
विधानसभा निवडणुकीनंतर आता डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना 1500,रुपये किंवा 2100 रुपये यापैकी किती मिळतात यावर संभ्रम कायम असताना भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार डिसेंबर महिन्यात मिळणाऱ्या हप्त्या संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होणार असे म्हटले आहे. राज्यात नव्याने स्थापित झालेले सरकार आता चांगले काम करीत आहे लवकरच मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होईल,यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.पण सोबतच लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही. सर्व विभाग आपले काम करीत असून सरकार चांगले निर्णय घेत आहेत त्यामुळे कुठेही काही अडचण नाही असे मुनगंटीवार म्हणाले.
निकालाला कलाटणी देणाऱ्या लाडक्या बहिण योजनेला कलाटणी मिळणार का?
महत्वाचे म्हणजे विरोधी पक्ष राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेत सत्ते लाट असल्याचे मानत होता, तर दुसरीकडे राज्यात लाडकी बहीण सारखी योजना लागू झाल्याने आपल्याला याचा फायदा मिळेल असा दावा महायुतीचे तिन्ही पक्ष करीत होते. यानंतर राज्यात निवडणुकीचे निकाल एकतर्फीच लागले.यावर महायुतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असल्याचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे ही योजना निवडणुक प्रचारात महायुतीचा मुख्य मुद्दा होता. विशेष म्हणजे निवडणूकदरम्यानच लाडक्या बहिणींना दिली जाणारी 1500 ची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता निवडणूक निकालाला कलाटणी देणाऱ्या या योजनेनंतर आता याचे नियम आणि निकष बदलून योजनेला कलाटणी सरकार देणार अशी चर्चा आहे.
माहितीनुसार वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि सधन घरातील महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा तक्रारी सरकारकडे आहे.त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेर छाटणी करून नियमबाह्य असलेले अर्ज बाद होईल अशीही चर्चा आहे.या संदर्भात आता माजी मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाल्या माजी मंत्री आदिती तटकरे.
माजी मंत्री अदिती तटकरे यांच्या मते महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवताना अगदी व्यवस्थित काम केले.राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. पुढेही कोणत्याही योजनेत फार मोठ्या संख्येने अर्जांची छाननी होणे शक्य नाही.कराव्या लागल्या तर यासाठी तक्रारींची गरज असते,पण सध्या मी या विभागाची मंत्री नसल्याने या संबंधात किती तक्रारी आल्या,याबाबत मला माहिती नाही,पण अर्जांची छाननी तक्रारीच्या आधारे होत असते,असल्या तर तपासल्या जातील.पण माझ्या मंत्रित्वाच्या काळात फारशा अशा तक्रारी आल्या नाहीत.अशा पद्धतीची तक्रारींचे अधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात येत असते,असेही माजी मंत्री अदिती तटकरे म्हणाले आहेत.