‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod

‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod

बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये.

मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत परंतु तेही सांगत नाही की ,मराठा समाजाला आरक्षण देणार कसे, एकीकडे ओबीसीला भावनात्मक भडकावून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याचे तयारी करित आहे, म्हणजेच हे दोन्ही नेते बबन तायवडे आणि छगन भुजबळ हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड – उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत असे विधान ओबीसी नेते, आरक्षण अभ्यासक , माजी खासदार Haribhau Rathod यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − two =