Electricity Rates Reduced : 1 एप्रिलपासून वीज स्वस्त ! सर्वसामान्यांना मोठा दिलासा.

Electricity Rates Reduced : महाराष्ट्रात आता अदाणी,टाटा आणि बेस्ट कंपन्यांकडून वीज पुरवठा होणार आहे.यामुळे आता येणाऱ्या 1 एप्रिल 2025 पासून राज्यात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज दर आयोगाकडून मंजूर करण्यात आले आहे.स्मार्ट T.O.D.मीटर {Time Of Day Meter} बसविणाऱ्या औद्योगिक आणि कमर्शियल वीज ग्राहकांना आता सकाळी 9 वाजता ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वीज वापरावर सवलत मिळेल.

यामुळे रात्री 10 ते 30  टक्के वीज वापर सवलत ची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वीजदर नियामक आयोगाकडून खाजगी स्तरावर वीज पुरवठा करणाऱ्या टाटा अदानी आणि बेस्टच्या नव्या वीजदर प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यानंतर आता नवीन वीज दर लागू होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

घरगुती,इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वीज ग्राहकांना सवलत. 

महाराष्ट्र राज्यात आता घरगुती वीज ग्राहक,आणि इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वीज ग्राहकांना वीज बीलांमध्ये सवलत मिळणार असल्याची अपेक्षा आहे.येत्या 1 एप्रिल पासून वीज दर कमी होऊ शकतात.

राज्य नियामक आयोगाने महावितरण कंपनी,अदानी,टाटा,बेस्ट आणि इतर कंपन्यांचे नवीन वीजदर लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे.या संदर्भात आयोगाने शुक्रवारच्या रात्री निर्णय घेत या मंजुरी प्रदान केली.

आता घरगुती औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना TOD  {टाईम ऑफ डे मीटर्स} लावल्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 वाजल्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 30 टक्के विज वापरावर सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र वीज ग्राहकांसाठी दुसरी बातमी ही आहे की, सायंकाळी 5 ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वीज वापरासाठी आता 20 टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.

याचा अर्थ नियामक आयोगाने एका हताने सवलत तर दुसर्या हाताने ती परत घेणे असा हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.यामुळे वरील काळात वीज वापरास जास्त पैसे मोजावे लागत असल्याने ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

Electricity Rates Reduced : खाजगी वीज पुरवठा कंपन्यांचे दर कमी होणार.

महाराष्ट्रात महावितरण आणि अदानी कंपनीचे 10 टक्के,टाटा वीज कंपनीचे १८ टक्के आणि बेस्टचे विजदर 9.2% कमी होणार आहे.पुढील पाच वर्षात नॉन ट्रॅडिशनल सेक्टरमधील सौर आणि इतर स्वस्त वीज उपलब्ध होईल.

त्यामुळे वीज UNIT दर कमी होण्याची शक्यता आहे.सोबतच राज्यात घरगुती ग्राहकांसाठी आणि यासह औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वीज ग्राहकांवर  क्रॉस सबसिडी चा जो  भोज बोज पडतो तो आता एप्रिल नंतर पुढील 5 वर्षात प्रत्येक टप्प्यात कमी होणार आहे.

यामुळे वीज ग्राहकांना बिल कमी होण्याचा दिलासा मिळू शकतो. दरम्यान सरकारने राज्य पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी गेस्ट हाऊस,निवासी हॉस्टेल,आणि इतर कमर्शियल आणि औद्योगिक हॉटेल्सना  पर्यटन ग्राहक श्रेणीत टाकले आहे.

त्यामुळे आता लवकरच अशा प्रतिष्ठानचे विज मध्ये लक्षणीय कमी होऊन त्यांची आर्थिक बचत होणार आहे.

घरगुती सोलर वीज साठी पूर्वीची युनिट्स कपात पद्धत कायम असेल.

सध्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकार केंद्राची पंतप्रधान PM सुर्यघर योजना माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त नागरिकांच्या घरापर्यंत सोलर पॉवर पेनल पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या योजनेतून घरांच्या छतावरील सोलर पॅनल लावलेल्या वीज ग्राहकांना त्यांनी दिवसात निर्माण केलेली वीज महावितरणला पुरवठा करून अशा ग्राहकांना इतर वेळेच्या महावितरणाला दिलेली वीज कपात होऊन सवलत मिळत होती.

आता  ग्राहकांना शून्य वीज बिल येईल असा प्रचार करण्यात आला होता,त्यामुळे राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसला. मात्र घरगुती सोलर पॅनल वरून निर्माण होणारी विजेची वीज पुरवठा केल्यानंतर कमाल विज मागणीच्या काळात अर्थातच सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता दरम्यान स्वस्त वीज मिळणार नाही असे महावितरण कंपनीने प्रस्ताव ठेवले होते,पण याला वीज नियामक आयोगापुढील झालेल्या सुनावणीत विरोध करण्यात आला आहे.

घरांच्या छतावरील लावलेल्या सौर ऊर्जा योजनेत ग्राहकांचा प्रतिसाद कमी होईल,अशी भीती आयोगाच्या सुनावणी दरम्यान व्यक्त करण्यात आली,यामुळे आता घरगुती सोलर पॅनल वीज पुरवठा योजनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची भूमिका महावितरण ने आयोगासमोर मानली आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती वीज ग्राहकांच्या अतिरिक्त विजबिल चा बोझ कमी करण्यासाठी सध्याची कार्यपद्धती कायम राहील,यात कोणताही वेळेत अतिरिक्त वीज वजा मिळेल,असे आयोगाने आपले आदेशात स्पष्ट केलेले आहे.दरम्यान राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार आणि सदस्य असलेले आनंद निंबळे आणि सुरेंद्र बियाणे यांच्या बेंचने महाराष्ट्रात सर्व खाजगी वीज कंपन्यांच्या आगामी 5 वर्षातील प्रस्तावांना गेल्या तीन महिन्यात अनेक सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी रात्री मंजुरी प्रदान केलेली आहे.

स्मार्ट TOD मीटरसाठी आता दिवसात विज सवलत मिळणार.

  • महाराष्ट्रात आता कृषी ग्राहक वगळता सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी TOD स्मार्ट मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्याची योजना आणण्यात आलेली आहे.
  • यात इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ग्राहकांसाठी TOD मीटर लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
  • टीओडी मीटर बसविण्यासाठी वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान सौर ऊर्जा निर्मितीच्या काळात वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिट सवलत देण्यात येणार आहे.
  • स्मार्ट मीटर बसविणारे औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळी दरम्यान 30 टक्के सवलत मिळणार आहे.
  • पण सायंकाळी 5 ते रात्री 10 आणि यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत वापरासाठी 20 टक्के वीज आकार जास्त राहणार आहे.

इतकी आहे महावितरनची महसूल तुट.

उल्लेखनीय म्हणजे महावितरण यापूर्वी यासाठी 48066  कोटी रुपयांची महसूल तुट सरकार समक्ष प्रस्तुत केली आहे.पण आयोगाने 44480 कोटी रुपये यासाठी मंजूर केलेले आहे.

यामुळे महावितरणचे नुकसान 14 टक्के अपेक्षित होता तो आता 22 टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे.इंधन खर्च वाढ आणि इतर कारणांमुळे महसूल तूट वाढण्याचा महावितरण ने दावा केला होता. आता सरासरी दर 2024 मध्ये प्रति युनिट 945 रुपये इतका होता आता तो पुढील 5 वर्षात ८.४६, ८.३८,३० ८.२२, आणि ८.१७ इतका राहणार आहे.

क्रॉस सबसिडीचे प्रमाण कमी होणार.

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी आता क्रॉस सबसिडीचे प्रमाण 113  एचडी वरून 101 टक्के आणि एलटी 108 वरून 100 यावर्षी कमी होणार आहे.पुढील 5 वर्षात हे  टप्प्या टप्प्यात आणखी कमी होणार असल्याची शक्यता आहे.

तर निवासी वीज ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून 10 ते 12 टक्के वीज दरात कपात होईल,पुढील पाच वर्षात ही कपात 24 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.राज्यात सोलर पावर निर्मिती वाढ होत असताना आता महावितरणचा इतर सर्व वीज कंपन्यांच्या ग्राहकांना स्वस्त विजेचा लाभ मिळणार आहे.

  • सध्याचे महावितरण चे घरगुती ग्राहकांसाठी विजदर
  •  स्थिर विज आकार दर- 130- 440 रुपये
  • वाहन आकार दर- प्रति युनिट 1.24 रुपये
  • सर्व प्रकारच्या घरगुती वीज ग्राहकांसाठी लागू

सध्याचे वीजदर प्रति युनिटमध्ये.

 {शून्य ते 500 युनिट पेक्षा जास्त  सध्याचे दर आणि नवीन दर}

  • सध्याचे unit दर
  • 0-100-4.71
  • 101-300 10.29
  • 301-500 14.55
  • 500+ 16.74
  • नवीन unit दर
  • 0-100 4.45
  • 101-300 9.64
  • 301-500 12.83
  • 500+ 14.33

अदानी वीज कंपनीचा 96 हजार 793 कोटी रुपयांचा दर वाढ प्रस्ताव. 

विशेष म्हणजे महाराष्ट्रात वीज पुरवठ्यासाठी अदानी वीज कंपनीने नुकतेच 96 हजार 793 कोटी रुपयांच्या खर्च करिता आपला प्रस्ताव सादर केला होता.त्याऐवजी वीजदर नियामक आयोगाने यापैकी 83958 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिलेली आहे.अदानी कंपनीचा वीज पुरवठ्याचा सध्या प्रति युनिट सरासरी दर हा 10.06 रुपयांवरून पुढे पाच वर्षात 7.79,7.08,7.5,7.51 इतका कमी होणार आहे.

टाटा कंपनीचा 4960 कोटी रुपयांच्या वीज दर वाढीचा प्रस्ताव.

तर टाटा वीज कंपनीने {Tata Electricity} वीज पुरवठासाठी 4960 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता.यात वीज दरवाढ नियामक आयोगाने 4591 कोटी खर्च मंजूर केलेले आहे.यामुळे सरासरी वीज पुरवठा दर 18 टक्के कमी होत असून पुढे तो प्रति युनिट 7.56 इतका असेल आणि पाच वर्षात विविध टप्प्यात तो 6.63  इतका कमी होणार आहे

बेस्ट चा 4394 कोटी रुपयांचा दरवाढीचा चा प्रस्ताव 

बेस्ट कंपनीच्या वीज दरवाढ संदर्भात कंपनीने 4394 कोटी रुपयांचा दरवाढीचाचा प्रस्ताव आयोग पुढे ठेवला होता. यात 4474 कोटी रुपये वाढ करण्याची आयोगाने मंजुरी दिली आहे.यामुळे आता मोनोरेल, मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात विज वापर असणाऱ्या औद्योगिक वीज ग्राहकांना वरील प्रमाणे वीजदर आकारला जाणार आहे.{New Unit Rate For Industrial Use}.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

14 − 10 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.