*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
सायखेड येथील नागरिकांमध्ये चर्चेला उधान.
दारव्हा: तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु विक्री हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यापैकीच सायखेड या गावात सुद्धा अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू असल्यामुळे सायखेड गावात तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गावातच दारू मिळत असल्यामुळे गावातील लोकं, तरुण वर्ग तसेंच १५-१६ वर्ष वय असलेली मुलं देखील दारूच्या व्यसना आधीन झालेली आहे. त्यामुळे ही लोक नियमित दारू च्या नशेत राहत असल्याने त्यांचे राहणीमान गलिच्छ होत चाललेले आहे.
त्यामुळे बिमाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणा विषयी गावातील तंटामुक्ती अध्यक्षांनी गावातील महिलांना घेऊन दारव्हा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. त्यानंतर एस. डी. पी. ओ. कार्यालयात सुद्धा तक्रार केली.परंतु आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाने या अवैध दारू विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती सायखेड येथील नागरिकांनी दिली आहे. या अवैध दारू विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात लोक दारू पितात आणी त्यामुळे त्या दारू पिणाऱ्यांच्या घरच्या स्रियांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
एवढा सारा अनर्थ या अवैध दारूमुळे होत आहे. आणि याला जवाबदार पोलीस प्रशासन असल्याचा दावा गावातील स्त्रिया व नागरीक करित आहे. या अवैध दारू विक्रीमुळे गावतील तंट्याच्या तक्रारी सुद्धा दारव्हा पोलीस स्टेशन ला येत आहे. परंतु पोलीस प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे बिट जमादाराची या गोष्टीला मुकंसंमती तर नसेल अशा प्रकारच्या अनेक चर्चांना उधाण आलेले आहे.त्यामुळे या अवैध दारु विक्रीचा प्रकार त्वरित थांबवावा. अशी मागणी सायखेड येथील नागरिकांनी केली आहे.अन्यथा आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया सायखेड येथील सुज्ञ नागरिकांनी दिली आहे.
पोलिसवाले हप्ते घेतात; दारू विक्रेते मुजोरी करतात.
गावातील सुज्ञ नागरिकांनी कित्येकदा ग्रामपंचायत च्या ठरवासह दारव्हा पोलीस स्टेशन ला तक्रारी दिल्या. परंतू पोलीस प्रशासनाची कोणतीच ठोस कारवाई यावर झालेली नाही.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात मोठ्या अपेक्षेने तक्रार केली.पंरतू अजून पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे गावातील लोकांमध्ये पोलीस हप्ते घेतात म्हणून दारू विक्रेते मुजोरी करतात.असा सुर निघतो आहे. तरी हा अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. अशी सायखेड येथील नागरिकांची मागणी आहे.