कोलवाई ग्रा. प. घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

कोलवाई ग्रा. प. घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

*दारव्हा प्रतिनिधी चेतन पवार*

ग्रामसभा न घेता मर्जीतल्या लोकांना घरकुलाचा लाभ.

तालुक्यातील कोलवाई ग्राम पंचायतीत घरकुल वाटपात सावळा गोंधळ असून,घरकुल योजनेचा लाभ ग्रामसभा न घेताच मर्जीतल्या लोकांना
देण्यात आलेला आहे.यामुळे मात्र गरजू लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहिलेले आहे.या प्रकरणाची चौकशी करून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.

गोरगरीब नागरिकांसाठी सरकारने “सर्वांसाठी घरे” ही योजना सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत कोलवाई ग्राम पंचायतीला सुध्दा घरकुलाचे लक्षांक प्राप्त झाले.कोलवाई ग्राम पंचायत अंतर्गत मोदी आवास योजना, रमाई आवास, ओबीसी आवास योजनेचा लाभ कोणतीही ग्राम सभा न घेता ग्रा. प.पदाधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे .वास्तविक पाहता गरजू व जे वास्तविक्त आवास योजनेकरीता पात्र होते.

अशा लोकांना डावलून त्यांच्या मर्जीतील लोकांना घरकुल योजनेचे लाभ देण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबत चा पहिला धनादेश सुध्दा या लोकांना मिळालेला आहे. सदर घरकुलाच्या योजनेची कोणतीही माहीती गावातील नागरीकांना न देता परस्पर घरकुलाचा लाभ देण्याचा प्रताप ग्राम पंचायतीने केलेला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून ग्राम पंचायतीने पाठविलेली यादी रद करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे. असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गोपाल शेळके,अंबादास कावळे,गजानन कावळे,बाबुराव गिरनाळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =