Ayushman Bharat : आता आयुष्मान भारत योजनेत सत्तर वर्षाच्या नागरिकांचाही समावेश,कार्ड बनवा फक्त हे 3 कागदपत्रे देवून.
देशात सर्वसामान्य नागरिक गरीब मध्यमवर्गीय आणि गरजूंना योग्य आरोग्य लाभ निशुल्क मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध आरोग्य योजना अमलात आणतात. यात सध्या महत्त्वाची आयुष्यमान भारत योजना देशभरात सुरू आहे. या योजनेत केंद्र सरकारने अधिक भर घातली आहे यात 70 वर्षावरील सर्व नागरिकांना समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढताना दिसत आहे.सरकारकडून आयुष्यमान भारत मधून पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड बनवले जात आहे.याचा वापर करून गरजू लाभार्थी कुठेही मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतात.
सरकारने आयुष्यमान कार्ड वर उपचाराची मर्यादा प्रति वर्ष पाच लाख रुपये एवढी ठेवली आहे.गरीब मध्यमवर्गीय आणि गरजूंना मोठ्या प्रमाणात आरोग्य लाभ आणि विविध गंभीर आजारांवर निशुल्क उपचार या आरोग्यकार्डमुळे होणार आहे.या योजनेचे कार्ड कसे बनवायचे,यासाठी कोणती पात्रता आणि आवश्यक कागदपत्र लागणार आहे,याबाबत नागरिकांना माहिती गरजेची आहे. त्यामुळे आपण आता पाहूया आयुष्यमान भारत कार्ड बनविण्यासाठी काय करावे लागेल.
आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी पात्रता काय?
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे कार्डमध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोक,ग्रामीण भागात राहणारे लोक,निराधार किंवा आदिवासी,असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक,कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग आहे असे कुटुंबीय,रोजंदारी मजूरवर्ग यात समाविष्ट करण्यात आले आहे.
आयुष्मान कार्ड बनवम्यासाठी अर्ज कसा करायचा?
जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डरहिवासी दाखलामोबाईल क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता असेल. जवळच्या सार्वजनिक सेतू सुविधा,सेवा केंद्रार जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटून याची माहिती घ्यावी लागेल,ती अधिकारी तुमची पात्रता आणि कागदपत्रे तपासून अर्ज जमा करून घेईल.यानंतर काही दिवसातच आयुष्यमान कार्ड बनविले जाते तसेच आयुष्यमान कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड सुद्धा आपण करू शकतो या कार्डमुळे नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपये पर्यंतचा लाभ मिळू शकणार आहे.